Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र. Show all posts

Tuesday, 2 October 2012

दुर्मिळ छायाचित्र

कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड

अतिशय दुर्मिळ छायाचित्र...महाराष्टाचे शिल्पकार एकत्र एकाच छायाचित्रात......यातील सर्वच माझे आदर्श आहेत. त्यांच्यातील थोडे चांगले गुण घेण आयुष्यात जमल तरी आयुष्याच सार्थक होईल..

Thursday, 23 February 2012

तेरेखोल

तेरेखोल [ वेंगुर्ला तालुका आणि पेडणे तालुका उत्तर गोवा ] एकच गाव पण दोन तालुक्यात ? आश्चर्य वाटतंय ना? मित्रांनो तेरेखोल हा गाव वेंगुर्ला तालुक्यात येतो पण याच गावातील तेरेखोल किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा (उत्तर गोवा जिल्हा) भाग आहे. १७ व्या शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या ताब्यात आहे. सध्या किल्यात एक आलिशान हेरिटेज हॉटेल बांधण्यात आल असून किल्यात प्रवेश निवडक लोकांनाच मिळतो. तेरेखोल पाहण्यासाठी वेंगुर्ला आणि सावंतवाडी बसस्थानकावरून बसेस उपलब्ध आहेत. गोव्यातून जाण्यासाठी केरी मार्गे यावे लागेल. विशाल तेरेखोल नदी पार करण्यासाठी फेरी बोट उपलब्ध आहेत. केरी (गोवा) - तेरेखोल आणि पाल्ये (गोवा) - आरोंदा (वेंगुर्ला) फेरीबोट सेवा सतत सुरु असते. केरी तून म्हापसा आणि पेडणे बसेस सतत उपलब्ध असतात.


जवळची प्रेक्षणीय स्थळे
१) तेरेखोल नदी
२) तेरेखोल किल्ला
३) रेडी गणपती मंदीर
४) टाटा इस्पात कंपनी रेडी
५) आरोंदा
६) तेरेखोल हेरिटेज रिसोर्ट, गोवा सरकार
७) तेरेखोल बीच
८) शिरोडा बीच
९) आरवली वेतोबा (दक्षिण काशी)
१०) उभादांडा बीच
११) वेंगुर्ला
१२) केरी बीच (पेडणे)


Wednesday, 8 February 2012

दुटप्पीपणा नको ..

मायावतींनी अमेठीच नाव बदलून छत्रपती शाहूमहाराज नगर अस ठेवल आहे. मात्र कॉंग्रेसला अजूनही हे नाव मान्य नाही. कितीही नाव बदला लोक अमेठीला अमेठी म्हणूनच ओळखतील अशी दर्पोक्ती काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली होती. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुढाकार करणाऱ्या कॉंग्रेसचे हे दुटप्पी धोरण कळत नाही. महाराष्ट्रात शाहू महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवणाऱ्या कॉंग्रेसचा शाहू महाराजांच्या नावाचा एवढा विरोध का?? उत्तरप्रदेश मध्ये कॉंग्रेस प्रादेशिक राजकारण करत आहे हे खर आहे पण मग डी.एम.के , मनसे आणि युपी कॉंग्रेस मध्ये फरक तो काय?? खर तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समानतेचे प्रतिक असलेल्या शाहू महाराजांचा आदर करत अमेठीचे बदललेले नाव स्वीकारले पाहिजे होते.

Sunday, 15 January 2012

पानिपत - एक शौर्यगाथा


पानिपतची लढाई ही एक शौर्यगाथाच आहे. मराठे हरले पण शत्रूच्या मनात दहशत बसवून हरले.  दत्ताजी शिंदेंचा  "बचेंगे तो और भी लढेंगे" हा आशावाद आणि निडर शौर्यगाथा म्हणजे पानिपत. महाराष्ट्रात मकर संक्रात साजरी होत असताना तिथे पानिपतात लाखो मराठे धारातीर्थी पडले. हजारो मराठी कुटुंब उध्वस्त झाली. या युद्धाचा मराठी मनावर गंभीर आघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणारा प्रचंड प्रतिकार करणारा मराठ्यांचा प्रमुख सरदार इब्राहिम खान गारदी पकडला गेला. त्याचे हाल हाल करून त्याला ठार मारण्यात आले. मराठी साम्राज्याची रक्षा करता करता बलिदान दिलेल्या त्या लाखो ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन.. या स्मृती दिनाच्या निमित्याने स्टार माझाने खास कार्यक्रम प्रक्षेपित केला होता त्याचे युट्यूबवरील व्हिडिओ लिंक मी येथे देत आहे. जरूर पहा.        




Wednesday, 2 March 2011

जातीयवाद

गेल्या काही दिवसात किंवा वर्षात आपल्याकडे सुचना क्रांती झाली आहे पण सुचना क्रांती बरोबर जातीयवादही तेवढाच फोफावला आहे. मनात जे जातीयवादी विचार आहेत ते मांडण्याच एक नव व्यासपीठच या सनातन्यांना मिळाल आहे. अलीकडेच महात्मा फुलेंवर जातीयवादी टिका करणारा एक लेख फेसबुकवर माझ्या वाचनात आला. टिका फुलेंच्या लिखाणावर व फुलेंवर होती. केवळ फुलेंवरच नव्हे इतिहासातील प्रत्येक व्यक्तीला एखाद्या जातीशी जोडायचे आणि मग इतर जातीच्या लोकांनी त्याचे चारित्र्यहरण करायचे हे रोजचेच झालय. टिका एवढी जातीयवादी की इतर जातींना शिक्षण दिले हीच महात्मा फुलेंची चुक असे दाखवण्याचा प्रयत्न.

निषेध आहे असे लिखाण करणाऱ्यांचा.
निषेध आहे असे लिखाण करणाऱ्यांचा
मला अस वाटतय की इतिहासात काय झाले हे चघळत बसुन आपला काही फायदा नाही होणार हे समजुन घेण महत्त्वाच आहे. केवळ जातीयवाद भडकवायचा असेल आणि त्यासाठी हा उपद्व्याप चालला असेल तर वेळीच सावध होण गरजेच आहे. अशा लोकांना कठोर विरोध करण आपल कर्तव्य आहे. आपण सगळे भारतीय नागरीक आहोत हेच पुरेसे नाही का? फुटीरतावादी तत्व जात, धर्म, वंश अशा मुद्यांवर देशात फुट पाडत आहेत. जातीचा अभिमान असणे किंवा स्वजातीय लोकांचा आदर असणे वाइट नाही पण जातीचा माज असणे हे पुरोगामी महाराष्ट्राच लक्षण नाही. 

सध्या काही कट्टर जातीयवादी संघटना अतिशय खालच्या स्तराला गेल्या आहेत. या संघटनांचे अनुयायी दुसऱ्या संघटनांमध्ये शिरून स्वत:च्या विकृत विचारांचा प्रचार करण्यात धन्यता मानतात. अशा सर्व लोकांसाठी आमच्या ब्लॉग आणि ग्रुपचे दार कायम बंद राहील हे लक्षात घ्यावे. अतिशय खालच्या स्तराला गेलेल्या काही संघटना स्वत:ची पुस्तके छापून त्यात दुसऱ्या समाजाची एवढी निंदानालस्ती  करत आहेत कि त्याला काही अंत नाही. एका पुस्तकाने एवढी खालची पातळी गाठली की ब्राह्मण स्त्रीयांवर अतिशय अश्लिल भाषेत लिखाण केल आहे. एवढच नव्हे तर जातीय दंगली कशा पेटवायच्या आणि बहुजन समाजाला यात कस ओढायचं याच विस्तृत लिखाण या विकृत लोकांनी केल आहे. आपल्याला अशा लोकांपासून सावध रहावे लागेल. 

Sunday, 26 December 2010

कोल्हापुरचा हायटेक उसाचा रस

कोल्हापुरचा हायटेक उसाचा रस

Friday, 11 June 2010

शनिवारवाडा, पुणे

शनिवारवाडा, पुणे

Monday, 18 May 2009

सिंग इज किंग

सिंग इज किंग


सिंग इज किंग बऱ्याच दिवसांनी भारतीय जनतेने एका पक्षाला स्वतंत्रपणे काम करण्याची मतांद्वारे अनुमती दिली आहे. भारतीय जनता घोडाबाजाराला वैतागली होती. छोटे प्रादेशिक पक्ष कशाप्रकारे सरकारची अडवणुक करायचे हे जनतेने पाहिले होते. जनतेला पुन्हा असे सरकार नको होते जे या पक्षांवर अवलंबून राहिल. जनतेने स्थैर्याला महत्त्व दिले यात वाद नाही. या विजयाचे श्रेय केवळ जनतेलाच नाही तर कॉंग्रेस पक्षालाही आहे. कॉंग्रेसचे नेते स्थिर सरकारचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात यशस्वी झाले. गेल्या पाच वर्षात सरकारने जी कामे केली ती सोनिया गांधी,मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी लोकांपर्यत पोहचवली. भाजपच्या नेत्यांचा अतिआत्मविश्वासही नडला. प्रचारात वापरण्यात आलेली भाषाही लोकांना आवडली नाही.

मनमोहनांना कमजोर म्हणता म्हणता त्यांचे विरोधकच कमजोर ठरले. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला राहुल गांधी यांनी. राहुलचा जोरदार प्रचार कॉंग्रेसच्या विजयात महत्त्वाचा ठरला. "आम आदमी के बढते कदम हर कदम पर भारत बुलंद" आणि "जय हो" हे नारे मह्त्त्वाचे ठरले. राहुल गांधी यांनी अत्यंत नम्र भाषेत , सामान्य भारतीय माणसाच विचार करुन प्रचार केला. त्यांनी तरुण लोकांची एक ब्रिगेड तयार केली. कॉंग्रेसच्या या विजयाने डाव्यांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. देश पुन्हा एकदा स्थिरतेकडे चालला आहे. याचा फायदा देशाला निश्चितच होइल.

पक्षीय बलाबल

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

206

भारतीय जनता पार्टी

116

समाजवादी पार्टी

23

बहुजन समाज पार्टी

21

तृणमुल कॉंग्रेस

19

द्रवीड मुन्नेत्र कळघम

18

पक्षीय बलाबल - महाराष्ट्र

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस +

25

भारतीय जनता पार्टी+

20

पक्षीय बलाबल - उत्तर प्रदेश

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस +

26

भारतीय जनता पार्टी +

10

समाजवादी पार्टी

23

बहुजन समाज पार्टी

20

Tuesday, 7 April 2009

भारनियमन कधी बंद होणार??

भारनियमन कधी बंद होणार??

लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार चालू आहे. प्रत्येक पक्ष वारेमाप आश्वासने देत आहे. 2 रुपयात गहु काय आणि राम मंदिर काय आश्वासनांची कमी नाही . पण सर्वात मह्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच विजेच्या मुद्द्यावर नेते स्पष्ट बोलत नाहीत. गेल्या 5 वर्षात वीजेचा प्रश्न सुटावा यासाठी आपल्या उमेदवाराने कोणते प्रयत्न केले ? विजेचा प्रश्न सुटावा यासाठी कोणते प्रयत्न तो करणार आहे हे जाणुन घेतले पाहिजे. कडाक्याच्या उन्हाळ्यात जेव्हा दुपारी 3 तास वीज जाते तेव्हा कळते की वीजेचा प्रश्न किती गंभीर आहे. जनरेटरचा वापर करणाऱ्या आणि वातानुकुलीत खोलीत बसणाऱ्यांना ह्या प्रश्नाची गंभीरता कळणार नाही. सर्व पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात या प्रश्नावर तरतुदी सुचवाव्यात आणि हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच सामान्यांची अपेक्षा आहे.

Tuesday, 1 July 2008

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात.

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात

समाजात अशी अनेक मुले असतात ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या या मुलांसाठी म.टा.ने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांची यशोगाथा म.टा. प्रसिध्द करणार आहे. म.टा.ने हे अभिनंदनिय पाउल उचलले आहे. समाजसेवा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी आणि संस्थांनी याची दखल घ्यावी.

मटा हेल्पलाइन

Friday, 27 June 2008

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. राज्यात प्रथम आलेल्या साताऱ्याच्या गौरव कुलकर्णी (९७.८४%) याचेही हार्दिक अभिनंदन. असेच यशस्वी व्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करा.


खाली दिलेल्या सर्व पहिल्या क्रमांकाच्या मानकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.

राज्यात प्रथम - गौरव कुलकर्णी (९७.८४%)
मुलींमध्ये पहिल्या - पूजा वानखेडे (यवतमाळ), सायली रूपसिंह सागर (उमरगा)- ९७.२३ %
रात्र शळेत पहिला - मेहदी गुलाम हुसेन महंमद (नागपूर) ८८.१५ %
अपंगांमध्ये पहिली - मनाली जाधव ९६.४६ %
मागासवर्गीयांत पहिली - सुरभी गणवीर (नागपूर) ९७.०७ %

Tuesday, 24 June 2008

सॅन फ्रान्सिस्को मराठी साहित्य संमेलन

Subscribe in a reader


सॅन फ्रान्सिस्को मराठी साहित्य संमेलन Top Blogs

सॅन फ्रान्सिस्कोत साहित्य संमेलन आयोजित करण्यास अनेकांनी प्रखर विरोध केला आहे. याविषयी आपले मत काय आहे? हा विरोध योग्य आहे का? हे साहित्यसंमेलन रद्द करुन भारतात घ्यावे का? आपली मते या ब्लॉगवर जरूर नोंदवा..

कृपया कोणावरही वैयक्तीक टीका नको. सभ्य भाषेचा वापर करा. धन्यवाद. प्रतिक्रिया देण्यासाठी येथे क्लिक करा.

Tuesday, 17 June 2008

चैतन्य राणे आणि वैभव पाटील राज्यात प्रथम

चैतन्य राणे आणि वैभव पाटील राज्यात प्रथम

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता सातवी) या वर्षी ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग कुडाळ हायस्कूलचा चैतन्य दिलीप राणे आणि कोल्हापूरचा वैभव पाटील या दोघांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २८६ गुण मिळाले. कुडाळने आपली विजयी परंपरा कायम राखली असून याच प्रशालेतील सौरव घुर्ये हा राज्यात तिसरा आला. शहरी विभागात सोलापूरची तेजश्री कोरे , चाळीसगावचा स्वप्नील अमृतकर पहिले आले. त्यांनाही २८६ गुण मिळाले. या सर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या पुढील आयुष्यातही असेच यश मिळवा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करा.

Thursday, 12 June 2008

वाचनीय लेख - केंद्र सरकारला शिवरायांचा विसर का?


वाचनीय लेख

आजचा
.टा. वाचलात का? त्यात "केंद्र सरकारला शिवरायांचा विसर का?" हा संजय व्हनमाने यांचा लेख प्रसिध्द झाला आहे. त्याची लिंक खाली देतो आहे. तेथे टिचकी मारा.

----> http://maharashtratimes.indiatimes.com/


हेच ते सरकारी संकेतस्थळ जेथे शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला नाही. -
----> http://india.gov.in/knowindia.php

हा दुर्लक्ष संतापजनक आहे. सरकारी संकेतस्थळावर हा दुर्लक्ष मुद्दाम केला गेला आहे का? दिल्लीतील मराठी नेते गप्प कसे ? गुरुनानक,औरंगजेब,नादिरशहा या सगळयांचा उल्लेख आहे मग शिवाजी महाराजांचा का नाही? असे अनेक प्रश्न उपस्थीत होतात. म्.टा. ने हे सगळे उघडकीस आणले, त्याबद्दल .टा.चे अभिनंदन.

- वामन परुळेकर


Wednesday, 11 June 2008

समुद्र किनाऱ्यावर बॉम्बचे फ्युज


समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्यूज



सोमवारी मालवणमधील एका समुद्रकिनाऱ्यावर लढाऊ विमानांतील बॉम्बसाठी वापरण्यात येणारे रशियन बनावटीचे बारा फ्युज आढळून आले आहेत. मालवणमधील देवबाग समुद्रकिनाऱ्यावर ह्या बॉम्बची पेटी ग्रामस्थांना आढळून आली. लढाऊ विमानातून फेकण्यात येणाऱ्या बॉम्बबरोबर हा फ्युज जोडला जातो शक्तिशाली स्फोटासाठी हा फ्युज बॉम्बबरोबर जोडला जातो. मोठया युध्दनौका नष्ट करण्यासाठी ह्या बॉम्बचा वापर होतो. नजिकच्या काळात कोणतेही मोठे युध्द झालेले नाही. मग हे फ्युज आले कुठून ?


* याच किनाऱ्यावर फ्युज सापडले


गोवा येथील नौदलाच्या पथकाने सदर फ्युजची तपासणी केली. तत्पूर्वी देवबाग या ठीकाणी उच्च दाबाचे कार्बनाडाय ऑक्साइड वायु भरलेले सिलेंडर आढळून आले होते. वेंगुर्ले परीसरातही असे तीन सिलेंडर सापडले होते.

समुद्रकिनाऱ्यावर वारंवार अशा संशयास्पद वस्तू आढळून येतात.ही भावी युध्दाची तयारी तर नव्हे ना? या वस्तू शत्रुच्याही असू शकतात त्यामुळे त्यांची योग्य दखल सरकारने घ्यावी.

Sunday, 11 May 2008

द ग्रेट मालवण



ग्रेट मालवण (ऑइलपेंट इफेक्ट)

सर्वाधिकार वामन परुळेकर

सर्व छायाचित्रे © अंतर्गत सुरक्षित

Saturday, 10 May 2008

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

उल्लेखनीय परिचारिका सेवेबद्दल नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कारासाठी आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील परिचारिका वैशाली सुरेश पाटील आणि नगर जिल्हातील सरला राजेंद्र भावसार यांची निवड झाली आहे. या दोन्ही परिचारिकांचे हार्दिक अभिनंदन. परिचारिकांचे काम अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळेच चांगले काम करणाऱ्या या परिचारिकांचे अभिनंदन करणे माझे कर्तव्य ठरते. १२ मे रोजी या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

Tuesday, 6 May 2008

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

आपल्या एस्.टी.ला २३ कोटीचा नफा झाला आहे. एशियातील सर्वात मोठया परीवहन महामंडळासाठी ही खुशखबरच आहे. एस्.टी च्या ताफ्यात १६२०० बसेस आहेत. ही प्रगती अशीच राहीली तर पुढील वर्षी एस्.टी. १५० कोटीचा नफा कमावेल. चला महाराष्ट्रासाठी ही एक जमेची बाजू आहे.

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

माझे ब्लॉगर मित्र आणि दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे मराठी समुदायतर्फे अभिनंदन.

संघातर्फे 10 व 11 मे रोजी चाळीसगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. क्षीरसागर यांचा या आधी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला असून महाराष्ट्रातील विविध साहित्यविषयक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटनेचा वेणेगुरकर स्मृती पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाला आहे. तसेच संवाद नाशिक व गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे कविता व कथालेखनाची पारितोषिके व मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानरंजन कथेचे पारितोषिक मिळाले आहे. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी कार्यकारिणी सदस्य, ताळगाव मराठी संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष, कविकुल साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

दक्षिण कोकणचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवलीच्या प्रसिध्द वेतोबाचा १२ वा वर्धापन दिन ७ ते ९ मे या कालावधीत साजरा होणार आहे.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे -


मे

संध्याकाळी ७ ते १० - सौ.निलाक्षी पेंढारकर,सुरेश बापट,चंद्रकांत कोळी यांचा नाटयरजनी कार्यक्रम

रात्री ११ - नाइक-मोचेमाडकर कंपनीचा दशावतारी नाटयप्रयोग




मे

संध्याकाळी ७ ते ९ - स्वरांगण

रात्री ९.३० - "सोहं" प्रतिष्ठाण मुंबई यांचा सुधिर फडके यांच्या गीतांची मैफील



मे

दुपारी १ ते ४ - महाप्रसाद

रात्री ९ ते १० - देवाची पालखी

रात्री ११ वाजता - मुंबई मराठी साहित्य संघ यांचे अशोक परांजपे लिखित "संत गोरा कुंभार नाटक"

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters