Showing posts with label चळवळ. Show all posts
Showing posts with label चळवळ. Show all posts

Tuesday, 2 October 2012

दुर्मिळ छायाचित्र

कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड

अतिशय दुर्मिळ छायाचित्र...महाराष्टाचे शिल्पकार एकत्र एकाच छायाचित्रात......यातील सर्वच माझे आदर्श आहेत. त्यांच्यातील थोडे चांगले गुण घेण आयुष्यात जमल तरी आयुष्याच सार्थक होईल..

Monday, 1 August 2011

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा. 

आज  १ ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णांनी लोककलेला सामाजिक आशय दिला. १९४० पासून साठेंनी रचनेला सुरुवात केली. दलित, कामगार आणि कष्टकरी यांच्या रोजच्या जीवनातील प्रश्न साठेंनी आपल्या लेखनातून मांडले. त्यांनी तत्कालीन विविध समस्या स्वत: रचनेतून मांडल्या. अण्णाभाऊ साम्यवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांची "गावाकडे मैना माझी । भेट नाही तिची " ही लावणी पत्नीचा दुरावा आणि बेळगाव कारवार मराठी भाषिकांचा दुरावा यथार्थ वर्णन करते.


गावाकडे मैना माझी । भेट नाही तिची ।
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, डांग, उंगरगावावर मालकी दुजांची
धोडं खंडणीची, कमाल दंडेलीची ।
चीड बेकीची । गरज एकीची
 

Wednesday, 19 January 2011

प्रबोधनकार

समाजव्यवस्था आणि ढोंगी धर्मरक्षकांविषयी झणझणीज अंजन टाकणारे विचार जरुर वाचा. अगदी लहानपणापासुनच ठाकरे माझे आदर्श आहेत. त्यांचे परखड विचार मला तंतोतंत पटतात. प्रभोधनकारांनी सुरु केलेल्या चळवळी इतिहासात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपणही या संकेतस्थळावर त्यांचे विचार वाचू शकता. 
www.prabodhankar.com
धन्यवाद - वामन परुळेकर

Wednesday, 16 April 2008

आद्य समाज सुधारक स्वामी विवेकानंद भाग - १ (धर्मसुधारणा)

धर्मसुधारणा


स्वामी विवेकानंद हे आद्य समाजसुधारक होते. त्यांनी हिंदू धर्म खऱ्या अर्थाने लोकांसमोर मांडला. स्वामी विवेकानंद आपल्या व्याख्यानातून धर्मातील रुढी,भोळसट कल्पना आणि जातियतेवर कठोर टीका करत.विवेकानंदाना इतर धर्मियाविषयी ही आदर होता. खरा हिंदू धर्म आणि त्याचे विचार त्यांनी विदेशात पोहचवले. स्वामींच्या काळात विदेशात हिंदू धर्माचे सुवर्णयुग होते. जगभ्रमण करुन स्वामींनी हिंदू धर्माचा प्रसार केला.

स्वामी गौतम बुध्दांनाही आपले गुरु मानत. त्यांची बौध्द धर्मावरील व्याख्यानेही विषेश गाजली.शिकागो येथे त्यांनी २७ ऑक्टोबर १८९३ ला स्त्रीयांच्या पाक्षिक सभेत बौध्द धर्मावर व्याख्यान दिले होते. त्यांची वाणी रसाळ होती. विदेशी लोक स्वांमींच्या विचारांनी मंत्रमुग्ध होत असत. स्वामींना वेंदान्त तत्वज्ञानाचा पूर्ण आभ्यास होता. त्यांनी केवळ हिंदू धर्माचाच नव्हे तर अन्य धर्मांचाही अभ्यास केला होता. याला पुरावा म्हणजे विवेकानंदानी पुज्यपाद (गुरुना) ७ ऑगस्ट १८८९ लिहिलेले पत्र. या पत्रात विवेकानंद म्हणतात की, "ख्रिस्ती सन्याशाने लिहिलेले ख्रिस्तानुसरण नावाचे पुस्तक आपणास पाठविले आहे.पुस्तक फारच सुंदर आहे.ख्रिस्ती लोकातही त्याग - वैराग्य आणि दास्यभक्ती होती हे पाहून मन विस्मयचकित होते. "

समाजसुधारणेबाबत त्यांची स्पष्ट मते होती.धर्म सोडून केलेली समाजसुधारणा त्यांना पसंत नव्हती. जातियतेवरही ते कठोर टीका करत. समाजसुधारणा करण्याकरीता हिंदूनी धर्म सोडता कामा नये अशी त्यांची धारणा होती. जातिभेद हे धर्माशी निगडीत नसून ती सामाजिक अवनतीसाठी कारणीभूत ठरलेली सामाजिक संस्था होय. अळसिंगा यांना २ नोव्हेंबर १८८३साली लिहिलेल्या पत्रात विवेकानंदानी म्हटले आहे की, "जातिभेद म्हणजे केवळ दृढ्मूल झालेली संस्था होय. तिचे कार्य संपले आहे.भारतीय समाजाची नष्ट झालेली सत्वबुध्दी पुन्हा जागृत करुन जातिभेद दुर करता येइल."

विवेकानंद सांगत की, दुसऱ्याची गुलामी कधीही पत्करु नका . स्वाधीन व्हा. स्वाधीनता हीच उन्नतीची गुरुकिल्ली आहे.स्त्रियांच्या शिक्षणाकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. धर्मप्रसार आणि धर्मसुधारणा ही दोन महत्वाची कार्य स्वामी करत होते.

क्रमशः

संदर्भ - स्वामी विवेकानंद ग्रंथावली - रामकृष्ण मठ

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters