Showing posts with label मुंबई. Show all posts
Showing posts with label मुंबई. Show all posts

Saturday, 2 June 2012

हिंदी चित्रपटांचा रावडी हंगाम

उन्हाळी हंगाम हा पुन्हा एकदा हिंदी सिनेमाचा सुवर्ण हंगाम ठरला. लाखोंच पोट भरणाऱ्या या चित्रपट उद्योगाने या दरम्यान खूप नफा कमवला. ६ चित्रपट सुपर हिट झाले तर दोन हिट. सर्वात जास्त अक्षय कुमारच्या हाउसफुल २ ने कमावले. आजच्या तारखेपर्यंत ११५ कोटी रुपये हाउसफुल २ ने कमावले आहेत. एका मागून एक सुपरहिट चित्रपट देणारा सुपरस्टार इम्रान हाशमी कसा मागे राहील. त्याचा जन्नत २ सुपरहिट ठरला. एकूण ४३ करोड या चित्रपटाने कमावले आहेत आणि अजूनही चित्रपट चांगलाच चालतो आहे. इशकजादे आणि विकी डोनर हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले. दोन्ही चित्रपटांची ३७ करोड ची कमाई झाली आहे.

आता या यशस्वी चित्रपटांच्या यादीत रावडी राठोड ची भर पडणार आहे. पहिल्याच दिवसात रावडी राठोड चित्रपटाने १६ करोड ची कमाई केली आहे जी रेकॉर्डतोड कमाई आहे. सिंगल स्क्रीनला तर हा चित्रपट १००% चालतोय. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. अक्षयचा हा एका वर्षातला दुसरा सुपरहिट चित्रपट आहे. या महिन्यात इम्रानचा शांघाय रिलीज होणार आहे. या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. कायम सुपरहिट देणारा इम्रान हाशमी आपल रेकॉर्ड कायम ठेवेल हे प्रोमो वरूनच कळून येतय.

Tuesday, 1 July 2008

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात.

म.टा.ने पुढे केला मदतीचा हात

समाजात अशी अनेक मुले असतात ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या या मुलांसाठी म.टा.ने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांची यशोगाथा म.टा. प्रसिध्द करणार आहे. म.टा.ने हे अभिनंदनिय पाउल उचलले आहे. समाजसेवा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी आणि संस्थांनी याची दखल घ्यावी.

मटा हेल्पलाइन

Wednesday, 4 June 2008

पेट्रोल दरवाढ झाली

पेट्रोल दरवाढ झाली
भारत सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोल रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महाग झाले आहे. गॅस ५० रुपयांनी महाग झाला आहे. आता गॅससाठी ३५३ रुपये मोजावे लागतील.केरोसीनच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. या दरवाढीनंतर इंधन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Wednesday, 14 May 2008

नागरी सुरक्षा

नागरी सुरक्षा


जयपूर येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. मुंबई अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अशा बॉम्बस्फोटांच्या घटना टाळण्यासाठी नागरीकांनी काही दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.



नागरीकांनी घ्यावयाची काळजी


  • तुमच्या दुकानात किंवा परीसरात येणाऱ्या प्रत्येक बॉक्स,पॅक,बॅगची कठोर तपासणी करा.
  • एकांतात ठेवलेली आणि संशयित वाटणारी पॅकेजीस,बॅग्जबद्दल ताबडतोब जवळच्या पोलिस स्थानकास माहिती द्या.
  • आपल्या दुकान किंवा घराच्या परीसरात एखादी अनोळखी वा संशयित व्यक्ती फिरत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
  • मालक नसलेल्या गिफ्ट बॉक्स, खेळणी यांना हात लावू नका.
  • तुमच्या परीसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख तपासून पहा.
  • जागा भाडयाने देताना त्या व्यक्तिची ओळख तपासून पहा. त्यासंबंधीत कागदपत्रे स्वतःजवळ ठेवा.

आणिबाणीच्या काळात प्रशासनाशी सहकार्य करा आणि शांतता राखा.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters