Showing posts with label कलाकार. Show all posts
Showing posts with label कलाकार. Show all posts

Wednesday, 7 March 2012

राष्ट्रीय पुरस्कार

देऊळ आणि बालगंधर्व या चित्रपटांच्या टीमचे मनापासून अभिनंदन. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊळ या मराठी चित्रपटाला जाहीर झाला आहे. देऊळ चित्रपटातील कलाकार गिरीष कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाही प्रादेशिक चित्रपटांचा दबदबा कायम राहिला. बालगंधर्व या मराठी चित्रपटाला मेकअप आणि वेशभूषेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सर्वांचे हार्दिक अभिनंदन. असेच दर्जेदार मराठी चित्रपट सतत मराठीचा झेंडा फडकवत ठेवतील हीच अपेक्षा.

Monday, 17 August 2009

शाहरुख खान

शाहरुख खान यांचा जो अपमान एका अमेरीकन विमानतळावर झाला त्यावरुन बरेच वादळ निर्माण झाले होते. गेले दोन दिवस एकच विषय बऱ्याच वाहिन्यांनी चघळला असेल. अनेक ब्लॉगर्सनी तर शाहरुखलाच दोषी धरलय. म्हणे या विषयाचा खुपच बाउ केला गेला. अमेरीकन नागरीकाला इतर देशात अशी वागणूक मिळाली असती तर? अमेरीका गप्प बसल असत का? एका विशेष आडनावामुळे त्याला ही वागणूक दिली गेली आहे का ? हा एक वादाचा विषय आहे. तस असेल तर ते दुर्भाग्यपुर्ण आहे.

मागे न्युयॉर्क चित्रपटात असाच एक विषय हाताळला होता. सगळ्याच आशियाइ लोकांना एकाच चष्म्यातून बघण्याचा अमेरीकन दृष्टीकोन चुकीचा आहे यात शंकाच नाही. हा समज बदलण्यासाठी भारतीय सरकारनेही प्रयत्न करावेत. केवळ एकसारखे दिसण हा काही गुन्हा होउ शकत नाही. सुरक्षेसाठी तपासणी समजता येइल पण त्यासाठी दोन-दोन तास ताब्यात घेण्याची गरज नाही.

Monday, 13 October 2008

चंद्रमुखी....रजनी....लकालकालकालका....

चंद्रमुखी....रजनी....लकालकालकालका....

ज्या ज्या प्रेक्षकांनी रजनीचा चंद्रमुखी पाहिला आहे त्यांच्या डोक्यात रजनीचा "लकालकालकालका" हा डायलॉग नक्कीच फिक्स बसला असणार. २००५ साली चंद्रमुखी ने चित्रपट उद्योगात वादळ निर्माण केले होते. चेन्नाईत सलग तिनशे दिवस या चित्रपटाने व्यवसाय केला होता. पहिल्या काही दिवसातच चित्रपटाने ८०कोटीचा गल्ला जमा केला होता.या चित्रपटाने भारतातच नव्हे तर परदेशातही चांगला व्यवसाय केला. जपानमध्ये या चित्रपटाला अफाट यश मिळाले. असे म्हणतात की या चित्रपटाच्या प्रभावामुळे अनेक जपानी मुलींनी तमिळ मुलांशी लग्ने केली. या चित्रपटाचा प्रभाव एवढा होता की जसे शोलेचे संवाद आजही अन्य चित्रपटांत व जाहिरातीत वापरले जातात तसेच चंद्रमुखीचे काही संवाद अन्य चित्रप्टात वापरले गेले. राघव यांचा सुप्रसिध्द तेलगु चित्रपट स्टाईल मध्ये रजनी लकालका संवाद वापरला गेला. त्यावेळी रजनीकांत म्हणजेच शिवाजीने या चित्रपटासाठी १५ कोटी घेतले. त्यावेळी हे मानधन कोणत्याही बॉलीवूड कलाकाराला मिळणाऱ्या मानधनापेक्षा अधिक होते. जॅकी चेन नंतर आशियात सर्वाधिक मानधन घेणाऱ्यात रजनीचा दुसरा नंबर होता.




चंद्रमुखीची कथा अन्य भारतीय चित्रपटांपेक्षा वेगळी होती. गंगा आणि तिचा पती सेंथील हे कोणतीही अंधश्रध्दा पाळत नसतात. ते गावातला एक राजवाडा विकत घेतात. लोकांची अशी अंधश्रध्दा असते की त्या राजवाडयात भुत राहतात. त्यामुळे त्या राजवाड्याकडे कोणीही फिरकत नसतं. कालांतराने गंगाला त्या राजवाडयाची खरी कथा कळते. गंगा स्वतःलाच कथेतील नर्तिका समजू लागते. चित्रपटात कथेची मांडणी फार सुंदर झाली आहे. विनोद,हाणामारी,सस्पेन्स,हॉरर अशा सर्व गोष्टी या चित्रपटात होत्या. १५० वर्षांपूर्वी घडलेली कथा आणि त्या कथेचा नायिका गंगा हिच्यावर पडलेला प्रभाव, दुसरी नायिका दुर्गावर असलेला संशय ह्या सगळ्याच उत्तम चित्रीकरण झाले आहे. चंद्रमुखी ज्या कथेवर बेतला आहे त्याच कथेवर एक मल्याळम चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले होते. त्या यशापासून प्रेरणा घेउन पी.वासू यांनी चंद्रमुखी तयार केला. चंद्रमुखीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी तो हिंदीत करायचा ठरवला. भुल-भुलैया या नावाखाली तीच कथा घेउन नवा चित्रपट तयार केला. "हरे राम हरे राम हरेकृष्णा हरे राम" हे गाणे प्रचंड गाजले. चित्रपटानेही चांगला व्यवसाय केला. 

अक्षयकुमार आणि प्रियदर्शन या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला आणखी एक सुपरहीट चित्रपट दिला. अशाप्रकारे एकाच कथेवर तीन वेगवेगळ्या भाषेत तीन वेगवेगळे सिनेमा प्रचंड गाजले. भुल-भुलैयाच्या यशानंतर चंद्रमुखी हिंदीत डब करुन प्रदर्शीत झाला. पण चित्रपट डब असल्यामुळे अपेक्षीत यश प्राप्त करु शकला नाही. हिंदीत भुल-भुलैयाच सरस ठरला. मात्र जर तमिळ चंद्रमुखी आणि हिंदी भुल भुलैयाची तुलना केली तर सरस कोण हे सांगणे कठीण होइल.आशियाइ प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तमिळ चंद्रमुखी मध्ये कु-फु कराटे फाइट सीन ठेवले आहेत ते भुल-भुलय्यात नाहीत. भुलभुलय्या विनोदी अंगाने जातो पण यात हॉररही तेवढाच जबरदस्त आहे. भुल-भुलैयातील अवनी म्हणजेच विद्या बालन हिची भुमिका अप्रतीम वठली आहे. चित्रपटात ती ज्यावेळी मोंजोलीकाच रुप धारण करते तेव्हा ती खरच भयानक वाटते. तमिळ चंद्रमुखीतील गंगा (प्रसिध्द अभिनेत्री नगमाची बहिण ज्योतीका ) तेवढी भयानक वाटत नाही. रजनी आणि अक्षयची तुलना होवू शकत नाही. रजनीकांत अभिनयसम्राट तर अक्षय हिंदीतला सुपरस्टार. वेळ मिळाला तर आपणही तिन्ही चित्रपट जरुर पहा.

Thursday, 19 June 2008

एक दशावतार कलाकार प्रवेशाच्या तयारीत

एक दशावतार कलाकार प्रवेशाच्या तयारीत




Sunday, 23 March 2008

आमीर खानचा नवा लूक

आमीर खानचा नवा लूक

हिंदी चित्रपट अभिनेता आमीर खान काल रेस चित्रपटाच्या प्रिमियर साठी आला होता. त्यावेळी त्याच्या नविन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमीरने लष्करी टाइप हेअरकट ठेवला आहे. हा नवा लूक त्याने आपल्या आगामी चित्रपट "गझनी" साठी ठेवला आहे. गझनीची कथा मूळ दक्षिणी चित्रपटाची आहे. गझनी अमिरचे घरचे निर्माण आहे. तर लवकरच आपल्या सर्वांना एक दर्जेदार चित्रपट पहायला मिळेल.


Saturday, 15 March 2008

अकबर द ग्रेट


आशुतोष गोवारीकर यांचा जोधा-अकबर अप्रतिम तर आहेच पण त्याचे संगीतही श्रवणीय आहे. ए.आर्.रेहमान यांचे संगीत आणि आषुतोष यांचे चित्रपट यांचे एक अतुट नाते बनले आहे. आशुतोष + रेहमान = हीट हे आता समिकरणच बनले आहे. चित्रपटाचे संगीत चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते. तो काळ आणि त्याकाळातले वैभव यांचे जिवंत चित्रण झाले आहे. गेल्या आठवडयापर्यंत या चित्रपटाने ४८,४०,००,००० एवढे उत्पन्न मिळविले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत या चित्रपटाने लगान,गुरु,वीर-झारा यासारख्या चित्रपटांना मागे सारले आहे. सध्या ह्या चित्रपटाला हीट श्रेणीत ठेवता येइल मात्र जर ट्रेंड असाच राहीला तर हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल.

परदेशात जास्त यश

गेल्या आठवडयापर्यंत जोधा-अकबर या चित्रपटाने परदेशात ३० करोड कमावले होते. परदेशात ३० करोड पेक्षा जास्त उत्पन्न मिळवणारा हा सातवा चित्रपट ठरला आहे. एकटया अमेरीका देशात या चित्रपटाने ९ करोड कमावले होते. परदेशात हा चित्रपट सर्वकालीन सुपरहीट ठरला आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटावरील बंदी उठवल्यामुळे उत्पन्न अजून वाढण्याची शक्यता आहे. येथे झालेल्या छोटया-मोठया आंदोलनांमुळे चित्रपटाला बरीच प्रसिध्दी मिळाली आहे.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters