Showing posts with label श्रध्दांजली. Show all posts
Showing posts with label श्रध्दांजली. Show all posts

Thursday, 3 September 2009

भावपुर्ण श्रध्दांजली

भावपुर्ण श्रध्दांजली

राजकारणात चांगली माणसे टिकत नाहीत अस म्हणतात ते खरच आहे. प्रशासन गावापर्यंत या लोकप्रिय मोहीमेवर निघालेले वाय. एस्. आर्.रेड्डी यांचे काल अपघाती निधन झाले. आंध्रप्रदेशचे ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते. आज सकाळी ही दुखद घटना मला कळली आणि फार वाइट वाटल.

व्यवसायाने डॉक्टर असलेले वाय्.एस्.आर्. समाजसेवकही होते. आयुष्यात कधीही न हरलेले वाय्.एस्.आर्. मृत्युसमोर मात्र हरले. त्यांना माझी भावपुर्ण श्रध्दांजली.

Saturday, 28 June 2008

फील्ड मार्शल माणेकशॉ तुझे सलाम ....

फील्ड मार्शल माणेकशॉ तुझे सलाम ....


७१च्या भारत-पाक युध्दात भारताचे नेतृत्त्व करणारे माजी लष्करप्रमुख फील्ड मार्शल माणेकशॉ यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. १९४८च्या जम्मू-काश्मीर लष्करी कारवाईच्यावेळी त्यांनी भारताचे यशस्वी नेतृत्त्व केले होते. ७१च्या युध्दातील त्यांची कामगीरी विशेष गाजली. बांगलादेश हे राष्ट्र उदयास आले. त्यांच्यावर काही लोकांनी खोटे आरोप लावले पण ते निराशेतून केलेले आरोप होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले फिल्ड मार्शल होते. १९७३मध्ये त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. हा पुरस्कार मिळालेला सेनापती कधीच निवृत्त होत नसतो. या सेनापतीच्या निधनाने केवळ भारतातच नव्हे तर बांग्लादेशातही दुःख व्यक्त करण्यात आले आहे.

अशा या शूरवीर सेनापतीस भावपूर्ण श्रध्दांजली.

Sunday, 23 March 2008

भावपूर्ण श्रध्दांजली

भावपूर्ण श्रध्दांजली

मराठी अभिनेते गणपत पाटील यांचे आज कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांनी ६० मराठी चित्रपटांत काम केले होते. त्यांचे तमाशाप्रधान चित्रपट फार गाजले. सोंगाडया,लावण्यवती अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भुमिका केली होती. गेली चार दशके त्यांनी मराठी चित्रपट उद्योगात आपले योगदान दिले होते.

गणपत पाटील यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली

Monday, 11 February 2008

भावपुर्ण श्रध्दांजली

भावपुर्ण श्रध्दांजली

जेष्ठ समाजसेवक आणि गांधीवादाचे पुजारी महाराष्ट्र भुषण बाबा ऊर्फ मुरलीधर देविदास आमटे (वय ९४) यांचे आज पहाटे सव्वाचारला आनंदवन येथे निधन झाले. बाबा आमटे यांनी आपले आयुष्य गोरगरीब कुष्टरोगी जनतेच्या सेवेत घालवले. त्यांचे भारत जोडो अभियान शांतता निर्मितीचा यशस्वी प्रयोग होता. बाबा नर्मदा बचाओ आंदोलनात दहा वर्षे सक्रिय होते. इंद्रावती नदीवरील इंचमपल्ली धरणाविरोधात त्यांनी "मानवी साखळी' उभारून गरीबांचा प्रश्न मांडला.

आपल्या सर्वांसाठी बाबा आमटे आदर्श आहेत. त्यांना माझी भावपुर्ण श्रध्दांजली...

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters