Showing posts with label शाहीर. Show all posts
Showing posts with label शाहीर. Show all posts

Monday, 1 August 2011

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा. 

आज  १ ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णांनी लोककलेला सामाजिक आशय दिला. १९४० पासून साठेंनी रचनेला सुरुवात केली. दलित, कामगार आणि कष्टकरी यांच्या रोजच्या जीवनातील प्रश्न साठेंनी आपल्या लेखनातून मांडले. त्यांनी तत्कालीन विविध समस्या स्वत: रचनेतून मांडल्या. अण्णाभाऊ साम्यवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांची "गावाकडे मैना माझी । भेट नाही तिची " ही लावणी पत्नीचा दुरावा आणि बेळगाव कारवार मराठी भाषिकांचा दुरावा यथार्थ वर्णन करते.


गावाकडे मैना माझी । भेट नाही तिची ।
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, डांग, उंगरगावावर मालकी दुजांची
धोडं खंडणीची, कमाल दंडेलीची ।
चीड बेकीची । गरज एकीची
 

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters