Showing posts with label बातम्या. Show all posts
Showing posts with label बातम्या. Show all posts

Wednesday, 4 June 2008

आज राष्ट्र संबोधन

आज राष्ट्र संबोधन



भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. आज रात्री पंतप्रधान राष्ट्राला संदेश देणार आहेत. रात्री साडे आठ नंतर त्यांच्या संदेशाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे आपादकालीन थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवरुन करण्यात येणार आहे.

पेट्रोल दरवाढ झाली

पेट्रोल दरवाढ झाली
भारत सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोल रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महाग झाले आहे. गॅस ५० रुपयांनी महाग झाला आहे. आता गॅससाठी ३५३ रुपये मोजावे लागतील.केरोसीनच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. या दरवाढीनंतर इंधन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Friday, 30 May 2008

विश्वासाची माती???

विश्वासाची माती ???

Bookmark and Share




गेला आठवडाभर टी.व्ही. मिडीया आणि संकेतस्थळांवर एक बातमी मोठया प्रमाणात चर्चेत होती. ही बातमी म्हणजे कोल्हापूरच्या एका युवकाने केलेली फसवणूक. आपली निवड नासात झाल्याचा दावा या युवकाने केला होता. गंमत म्हणजे देशातील काही टी.व्ही. वाहिन्यांनी या निवड बातमीचे डोळे झाकून प्रक्षेपण केले होते. त्यावेळी बातमीचा सत्यपणा पडताळण्याची गरज कुठल्याही वाहिनीला वाटली नव्हती. सर्वांनी डोळे झाकून बातमी दिली होती. मिडियावर विश्वास ठेवणे योग्य होइल का? हा विचार मी करतोय. एका युवकाने मिडियाला लिलया फसवले तर मग अन्य बातम्यांवर तरी विश्वास कसा ठेवायचा?

राज ठाकरेंचे आंदोलन असो किंवा कांबळेची निवड, लोकांचा टी.व्ही.मिडियावरचा विश्वास उडत चालला आहे. बातमी द्यायची घाई एवढी की शहानिशा करायलाच वेळ नाही. नव्या नव्या चौविस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, त्यांच्यातील भयानक स्पर्धा, या सगळ्यात दर्जेदार बातम्या द्यायला वेळ कोणाला आहे. मित्रांनो या वाहिन्यांच्या बातम्यांवर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाच्या वैयक्तिक मतांवर अवलंबून आहे. पण दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या वाहिन्यांच्या दर्जावर विचार व्हायलाच हवा. जेव्हा तासनतास नट नटयांच्या बातम्या दाखवताना प्रेक्षकांना हेच आवडते म्हणून आम्ही दाखवतो ही पुस्ती जोडली जाते तेव्हा जरुर विचार व्हायलाच हवा.

पण हा टी.आर्.पी. तरी खरा आहे का? लोकसभेत मंत्र्यांनीही टी.आर्.पी.बद्दल संशय व्यक्त केला होता. त्यांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न झाला होता. लोकशाहीसाठी हा एक भयानक प्रकार आहे. मिडिया अभिव्यक्तीच्या नावाखाली दबावतंत्र वापरणे घातकच आहे. सिंधुमहोत्सवावेळी काही वाहिन्यांचे खरे स्वरुप उघडे झाले होते. त्यावेळी कठोर टीका झाली होती. या वाहिन्यांमध्ये काही वाहिन्यांनी आपला दर्जा मात्र टिकवून ठेवला आहे. ह्या वाहिन्यांना लोकाश्रय मिळणे गरजेचे आहे. शक्य आहे की माझ्या मतांशी आपण सहमत नसाल . आपल्या मतांची जरुर नोंद करा.


Saturday, 10 May 2008

हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन

उल्लेखनीय परिचारिका सेवेबद्दल नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कारासाठी आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील परिचारिका वैशाली सुरेश पाटील आणि नगर जिल्हातील सरला राजेंद्र भावसार यांची निवड झाली आहे. या दोन्ही परिचारिकांचे हार्दिक अभिनंदन. परिचारिकांचे काम अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळेच चांगले काम करणाऱ्या या परिचारिकांचे अभिनंदन करणे माझे कर्तव्य ठरते. १२ मे रोजी या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

Thursday, 8 May 2008

पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान


पुतीन रशियाचे नवे पंतप्रधान



५५ वर्षांचे पुतीन रशियाने नवे पंतप्रधान होतील. पुतीन यांच्या युनायटेड रशियन पार्टीला पूर्ण बहुमत आहे. दोन वेळा रशियाचे राष्ट्रपतीपद भुषविलेले पुतीन तिसऱ्या वेळी रशियन कायद्यामुळे राष्ट्रपती बनू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपद स्विकारले. रशियन पंतप्रधानांच्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या पाच वर्षात पुतीन यांनी रशियाला चांगले नेतृत्त्व दिले. रशियाची जी.डी.पी. वाढही दर्शनिय आहे. पुतीन यांच्या सरकारने भारताबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंधही कायम राखले. भविष्यातही पुतीन यांचा रशियावरील दबदबा कायम राहील यात शंकाच नाही.

Tuesday, 6 May 2008

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

आपल्या एस्.टी.ला २३ कोटीचा नफा झाला आहे. एशियातील सर्वात मोठया परीवहन महामंडळासाठी ही खुशखबरच आहे. एस्.टी च्या ताफ्यात १६२०० बसेस आहेत. ही प्रगती अशीच राहीली तर पुढील वर्षी एस्.टी. १५० कोटीचा नफा कमावेल. चला महाराष्ट्रासाठी ही एक जमेची बाजू आहे.

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

माझे ब्लॉगर मित्र आणि दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे मराठी समुदायतर्फे अभिनंदन.

संघातर्फे 10 व 11 मे रोजी चाळीसगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. क्षीरसागर यांचा या आधी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला असून महाराष्ट्रातील विविध साहित्यविषयक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटनेचा वेणेगुरकर स्मृती पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाला आहे. तसेच संवाद नाशिक व गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे कविता व कथालेखनाची पारितोषिके व मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानरंजन कथेचे पारितोषिक मिळाले आहे. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी कार्यकारिणी सदस्य, ताळगाव मराठी संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष, कविकुल साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

दक्षिण कोकणचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवलीच्या प्रसिध्द वेतोबाचा १२ वा वर्धापन दिन ७ ते ९ मे या कालावधीत साजरा होणार आहे.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे -


मे

संध्याकाळी ७ ते १० - सौ.निलाक्षी पेंढारकर,सुरेश बापट,चंद्रकांत कोळी यांचा नाटयरजनी कार्यक्रम

रात्री ११ - नाइक-मोचेमाडकर कंपनीचा दशावतारी नाटयप्रयोग




मे

संध्याकाळी ७ ते ९ - स्वरांगण

रात्री ९.३० - "सोहं" प्रतिष्ठाण मुंबई यांचा सुधिर फडके यांच्या गीतांची मैफील



मे

दुपारी १ ते ४ - महाप्रसाद

रात्री ९ ते १० - देवाची पालखी

रात्री ११ वाजता - मुंबई मराठी साहित्य संघ यांचे अशोक परांजपे लिखित "संत गोरा कुंभार नाटक"

Thursday, 1 May 2008

इंदिरा गांधी सर्वात खंबीर नेत्या- अडवाणी

लोकसभेत भारत-अमेरीका अणुकरारावर चर्चा सुरु असताना अडवाणींनी हे उद्गार काढले. इंदिरा गांधी या खंबीर नेत्या होत्या. त्यांनी अमेरीकन आणि आंतरराष्ट्रीय दबावापुदे मान झुकवली नाही. त्यामुळेच राजकिय विरोधक असलो तरी त्यांचे कौतुक करण्यात मला काहिच गैर वाटत नाही.

अडवाणी पुढे म्हणाले की, इंदिरा गांधींनी पंतप्रधान या नात्याने देशाच्या संरक्षणाला नेहमीच प्राधान्य दीले म्हणूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय दबावापुढे न झुकता पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. विद्यमान पंतप्रधानांनी कोणताही दबाव न घेता देशहिताचा निर्णय घ्यावा.

Monday, 17 December 2007

संस्कृत ऑर्केस्ट्रा

ऐकून जरा आश्चर्य वाटल ना? पण हे खर आहे. काल ५१ व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाले निमीत्तसंस्कृतसंध्या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी येथील खातू नाटयमंदीरात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृतविभागाने केल होत. त्यावेळी हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. संस्कृतच्या प्रसारासाठी केलेला हा कार्यक्रमरसिकांना मात्र सुखद धक्का ठरला.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters