अखेरची लढाई सुरु
श्रीलंकन फौजेने आता उत्तर भागात प्रवेश केला आहे.
हा उत्तरेकडील भाग नो फायर झोन म्हणून ओळखला जातो.
या भागात ताज्या चकमकीत 30
ते 40
तमिळ टायगर मारले गेले आहेत.
श्रीलंकन सेनेने आपली आक्रमक मोहीम कायम ठेवत उत्तर भागात धडक मारली आहे.
नो फायर झोनच्या पलीकडे किमान 6000
तमिळ जनता अडकल्याची बातमी आहे.
प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावानंतर श्रीलंकन सेनेने या जनतेची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
त्यासाठी विशेष पॉंईंट तयार केले आहेत.
या ठीकाणांची माहीती जनतेला मिळावी यासाठी लाउडस्पिकरवरुन जनतेला सुचना दिल्या गेल्या.
अशाप्रकारचे मानवतावादी अभियान जगात प्रथमच केल्याचा श्रीलंकन सेनेचा दावा आहे.
तमिळ टायगर आणि श्रीलंकन सेनेच्या लढाईत निष्पाप जनेतेचा बळी जाउ नये हीच प्रार्थना आपण करु शकतो.
भारनियमन कधी बंद होणार??
लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार चालू आहे. प्रत्येक पक्ष वारेमाप आश्वासने देत आहे. 2 रुपयात गहु काय आणि राम मंदिर काय आश्वासनांची कमी नाही . पण सर्वात मह्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच विजेच्या मुद्द्यावर नेते स्पष्ट बोलत नाहीत. गेल्या 5 वर्षात वीजेचा प्रश्न सुटावा यासाठी आपल्या उमेदवाराने कोणते प्रयत्न केले ? विजेचा प्रश्न सुटावा यासाठी कोणते प्रयत्न तो करणार आहे हे जाणुन घेतले पाहिजे. कडाक्याच्या उन्हाळ्यात जेव्हा दुपारी 3 तास वीज जाते तेव्हा कळते की वीजेचा प्रश्न किती गंभीर आहे. जनरेटरचा वापर करणाऱ्या आणि वातानुकुलीत खोलीत बसणाऱ्यांना ह्या प्रश्नाची गंभीरता कळणार नाही. सर्व पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात या प्रश्नावर तरतुदी सुचवाव्यात आणि हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच सामान्यांची अपेक्षा आहे.
बेंगलोर अय्यगांर स्वादिष्ट केक