Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Thursday, 23 February 2012

फेसबुकवरील खोटा प्रचार

हा एक नवीन खोटा प्रचार. हा फोटो बघून मला धक्काच बसला. एखाद्या पक्षाविरुद्ध प्रचार करताना लोक एवढ्या खोट्या गोष्टी पसरवतील आणि त्याच्यावर आपले फेसबुककर एवढा विश्वास ठेवतील अस स्वप्नातही वाटल नव्हत. मित्रांनो डोळे झाकून शेअर करण सोडा. आपण नक्की काय शेअर करतोय याचा विचार करा. सत्यता पडताळून पहा. किती दिवस तुम्ही फसत राहणार. स्वतःच्या डोक्याचा वापर करा, एकाच संकुचित विचारधारेला वाहून घेवू नका. त्या ऐवजी डोळे उघडून जगाकडे पहा. मुद्देसूद टीका करणे वेगळ आणि टिंगलटवाळी, विकृत प्रचार करणे वेगळ. आज निदान माझ्या दहा मित्रांच्या Wall वर ही पोस्ट मला दिसली. 



सत्य हे आहे की लुईस ब्रेल हा कोणी इटालियन राजा नसून तो जगप्रसिद्ध ब्रेल लिपीचा जनक आहे. ब्रेल लिपीचा वापर अंध लोक लिहिण्या-वाचण्यासाठी करतात. पेशाने तो एक प्राध्यापक आणि संगीतकार होता. त्याचा जन्म आणि मृत्यू दोन्ही फ्रांस या देशात झाले. ब्रेलच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १८५४ मध्ये फ्रांसने ब्रेल लिपीचा अधिकृतपणे स्वीकार केला. १८७३ च्या अंध शिक्षकांच्या जागतिक परिषदेनंतर ब्रेल लिपीचा प्रसार मोठया प्रमाणात युरोपात झाला. १९१६ मध्ये अमेरिकाने ब्रेल लिपीचा स्वीकार केला आणि १९३२ मध्ये इंग्लिश भाषेकरिता ब्रेल लिपी ठरविण्यात आली. मानवतेला फार मोठ योगदान देणाऱ्या ब्रेलची दखल जगातल्या सर्वच देशांनी घेतली. युरोपियन संघाने दोन विशेष नाणी चलनात आणली. अमेरिकेने एक डॉलरच्या नाण्यावर ब्रेलची दखल घेतली. बेल्जिअम, ईराण, चीन, इटली या देशांनीही ब्रेलचा फोटो असलेली नाणी चलनात आणून ब्रेलचा मरणोपरांत सन्मान केला. २००९ साली लुईस ब्रेल यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारनेही दोन रुपयाचे नाणे चलनात आणले. तोच हा फोटो. त्याचा वापर काही विकृत लोक प्रचारासाठी करत आहेत. कृपया जागे व्हा आणि अश्या समाजासाठी स्वत: आयुष्य वाहिलेल्या लोकांबद्दल खोटी माहिती पसरविणाऱ्या पोस्ट शेअर करू नका.

Wednesday, 8 February 2012

दुटप्पीपणा नको ..

मायावतींनी अमेठीच नाव बदलून छत्रपती शाहूमहाराज नगर अस ठेवल आहे. मात्र कॉंग्रेसला अजूनही हे नाव मान्य नाही. कितीही नाव बदला लोक अमेठीला अमेठी म्हणूनच ओळखतील अशी दर्पोक्ती काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली होती. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुढाकार करणाऱ्या कॉंग्रेसचे हे दुटप्पी धोरण कळत नाही. महाराष्ट्रात शाहू महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवणाऱ्या कॉंग्रेसचा शाहू महाराजांच्या नावाचा एवढा विरोध का?? उत्तरप्रदेश मध्ये कॉंग्रेस प्रादेशिक राजकारण करत आहे हे खर आहे पण मग डी.एम.के , मनसे आणि युपी कॉंग्रेस मध्ये फरक तो काय?? खर तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समानतेचे प्रतिक असलेल्या शाहू महाराजांचा आदर करत अमेठीचे बदललेले नाव स्वीकारले पाहिजे होते.

Friday, 11 June 2010

युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४

युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४

दि.२ डिसेंबर १९८४, भोपाळ आणि भारताच्या इतिहासातील काळा दिवस. २ डिसेंबरच्या मध्यरात्री युनिअन कार्बाइडच्या प्रमुख प्लांन्ट मधुन एम् आय् सी गॅस आणि टोक्सीन्सची गळती झाली. भोपाळमध्ये मृत्युने थैमान घातल. सरकारी आकडेवारीनुसार लगेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 3000 ते 4000 च्या दरम्यान होती. घटनेनंतर पहिल्या आठवडयात जवळजवळ 8000 लोकांनी आपला जीव गमवला होता. पुढच्या काही महिन्यात 10000 ते 20000 लोकांनी आपला जीव गमावला. 1,00,000 ते 2,00,000 लोकांना कायम स्वरुपी इजा झाल्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हे संकट एवढ भयानक होत की कल्पना करण ही शक्य होत नाही. 2000 जनावर मृत्युमुखी पडली. झाडांवरची पानही पिवळी होउन गळून पडली. हॉस्पीटलमधील स्टाफला या घटनेला कस सामोर जायच याच कोणतही प्रशिक्षण दिलेल नव्हत.

Thursday, 8 April 2010

लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर



लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर. "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हे विचार परखडपणे मांडणारे टिळक माझ्या डोळ्यासमोर उभे राहीले. भारतीय स्वातंत्र्यातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या घरी एक छोटे म्युझिअम आहे. त्यात त्यांनी वापरलेल्या वस्तु आणि तत्कालीन पत्रे संग्रहीत करण्यात आली आहेत. त्यांच्या घरानजिकच टिळक आळीतील ऐतिहासिक गणेश मंदिर आहे. जर मागे कॉंग्रेसचे पुरातन कार्यालय आहे. जिथे अनेक महान नेते वास्तव्य करुन गेले आहेत.

Thursday, 3 September 2009

भावपुर्ण श्रध्दांजली

भावपुर्ण श्रध्दांजली

राजकारणात चांगली माणसे टिकत नाहीत अस म्हणतात ते खरच आहे. प्रशासन गावापर्यंत या लोकप्रिय मोहीमेवर निघालेले वाय. एस्. आर्.रेड्डी यांचे काल अपघाती निधन झाले. आंध्रप्रदेशचे ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते. आज सकाळी ही दुखद घटना मला कळली आणि फार वाइट वाटल.

व्यवसायाने डॉक्टर असलेले वाय्.एस्.आर्. समाजसेवकही होते. आयुष्यात कधीही न हरलेले वाय्.एस्.आर्. मृत्युसमोर मात्र हरले. त्यांना माझी भावपुर्ण श्रध्दांजली.

Monday, 18 May 2009

सिंग इज किंग

सिंग इज किंग


सिंग इज किंग बऱ्याच दिवसांनी भारतीय जनतेने एका पक्षाला स्वतंत्रपणे काम करण्याची मतांद्वारे अनुमती दिली आहे. भारतीय जनता घोडाबाजाराला वैतागली होती. छोटे प्रादेशिक पक्ष कशाप्रकारे सरकारची अडवणुक करायचे हे जनतेने पाहिले होते. जनतेला पुन्हा असे सरकार नको होते जे या पक्षांवर अवलंबून राहिल. जनतेने स्थैर्याला महत्त्व दिले यात वाद नाही. या विजयाचे श्रेय केवळ जनतेलाच नाही तर कॉंग्रेस पक्षालाही आहे. कॉंग्रेसचे नेते स्थिर सरकारचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात यशस्वी झाले. गेल्या पाच वर्षात सरकारने जी कामे केली ती सोनिया गांधी,मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी लोकांपर्यत पोहचवली. भाजपच्या नेत्यांचा अतिआत्मविश्वासही नडला. प्रचारात वापरण्यात आलेली भाषाही लोकांना आवडली नाही.

मनमोहनांना कमजोर म्हणता म्हणता त्यांचे विरोधकच कमजोर ठरले. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला राहुल गांधी यांनी. राहुलचा जोरदार प्रचार कॉंग्रेसच्या विजयात महत्त्वाचा ठरला. "आम आदमी के बढते कदम हर कदम पर भारत बुलंद" आणि "जय हो" हे नारे मह्त्त्वाचे ठरले. राहुल गांधी यांनी अत्यंत नम्र भाषेत , सामान्य भारतीय माणसाच विचार करुन प्रचार केला. त्यांनी तरुण लोकांची एक ब्रिगेड तयार केली. कॉंग्रेसच्या या विजयाने डाव्यांचे महत्त्व संपुष्टात आले आहे. देश पुन्हा एकदा स्थिरतेकडे चालला आहे. याचा फायदा देशाला निश्चितच होइल.

पक्षीय बलाबल

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस

206

भारतीय जनता पार्टी

116

समाजवादी पार्टी

23

बहुजन समाज पार्टी

21

तृणमुल कॉंग्रेस

19

द्रवीड मुन्नेत्र कळघम

18

पक्षीय बलाबल - महाराष्ट्र

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस +

25

भारतीय जनता पार्टी+

20

पक्षीय बलाबल - उत्तर प्रदेश

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस +

26

भारतीय जनता पार्टी +

10

समाजवादी पार्टी

23

बहुजन समाज पार्टी

20

Tuesday, 7 April 2009

भारनियमन कधी बंद होणार??

भारनियमन कधी बंद होणार??

लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार चालू आहे. प्रत्येक पक्ष वारेमाप आश्वासने देत आहे. 2 रुपयात गहु काय आणि राम मंदिर काय आश्वासनांची कमी नाही . पण सर्वात मह्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजेच विजेच्या मुद्द्यावर नेते स्पष्ट बोलत नाहीत. गेल्या 5 वर्षात वीजेचा प्रश्न सुटावा यासाठी आपल्या उमेदवाराने कोणते प्रयत्न केले ? विजेचा प्रश्न सुटावा यासाठी कोणते प्रयत्न तो करणार आहे हे जाणुन घेतले पाहिजे. कडाक्याच्या उन्हाळ्यात जेव्हा दुपारी 3 तास वीज जाते तेव्हा कळते की वीजेचा प्रश्न किती गंभीर आहे. जनरेटरचा वापर करणाऱ्या आणि वातानुकुलीत खोलीत बसणाऱ्यांना ह्या प्रश्नाची गंभीरता कळणार नाही. सर्व पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात या प्रश्नावर तरतुदी सुचवाव्यात आणि हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच सामान्यांची अपेक्षा आहे.

Monday, 30 March 2009

विकास हाच प्रमुख मुद्दा असावा.

विकासाचा मुद्दा हवा.

गेल्या अनेक निवडणुकात या देशात अनेक प्रयोग झाले. गरीबी हटाव,शीख दंगलीच भांडवल,बोफोर्स,राम मंदीर,इंडीया शायनिंग अशा अनेक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. कधी कांद्याने कोणाला रडवले तर कधी तोफेने. येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भावनिक मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. धर्माधर्मात फूट पाडण्याचे प्रयत्न चालु झाले आहेत. हे सर्व कुटील डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

उमेदवार निवडताना त्याची जात,धर्म कोणता हे पहाण्यापेक्षा त्याने कोणती विकासाची कामे केली आहेत ते पहाणे जरुरीचे आहे. उमेदवाराच्या भावी योजना काय आहेत? तो सर्वसामान्यांमध्ये मिसळू शकतो का? उमेदवार भ्रष्टाचारी तर नाही ना? देशस्तरावरील प्रश्नांची त्याला जाण आहे का? उमेदवार नवीन असेल तर यापुर्वी काम केलेल्या क्षेत्रातील त्याचे कार्य कसे होते हे जरुर तपासुन पहावे.


Sunday, 29 March 2009

लोकसभा २००९

लोकसभा २००९
हरेकृष्णाजी तुम्ही चांगला विषय निवडलात. हरेकृष्णाजी हे मराठीतील आघाडीचे ब्लॉगधारक आहेत. नवीन मंत्रीमंडळ कोणत्याही पक्षाचे असो त्यात विचारवंत आणि तज्ञ लोकांचा भरणा असणे गरजेचे आहे. प्रामाणिक लोकांची देशाला गरज आहे. देशाचे प्रांतवाद ,धर्मवाद,जातीवाद यामुद्यांवर विभाजन करणे सोपे आहे पण देश जोडणे फार कठीण आहे. काही वर्षांपुर्वी भारत जोडो अभियानाने एक प्रयत्न केला होता. देश अखंड ठेवण्यासाठी अशा अभियानांची गरज आहे. विकासाचा मुद्दाही महत्वाचा आहे. सुरक्षेचा मुद्दा पण महत्वाचा आहे. मी काही नेत्यांची नावे जी मला योग्य वाटली ती देत आहे. अन्य ब्लॉग धारकांनी जरुर नावे सुचवावीत.

श्री. डॉ.मनमोहन सिंग
श्री. डॉ..पी.जे.
श्री. शाहनवाज हुसेन
श्री. सुरेश प्रभु
श्री. प्रो. बासुदेव बर्मन (सी.पी.आय.एम्.)
श्री.डॉ.सुजन चक्रवर्ती (सी.पी.आय.एम्.)
श्री. प्रणव मुखर्जी
श्री. अंबुमणी रामदास
श्री. पी. चिदंबरम
श्री. प्रफुल्ल पटेल
श्री. प्रकाश करात
श्री. शीला दिक्षित (खासदार नाही पण मंत्री होण्यास लायक)
श्री.अभिषेक सिंघवी
श्री.डॉ.तुषार चौधरी

तसेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या मुद्द्यांना महत्व द्यावे असे तुम्हाला वाटते ? आपली मते जरुर नोंदवा. हरेकृष्णाजी आपणही आपली मते जरुर मांडा.

Thursday, 1 May 2008

इंदिरा गांधी सर्वात खंबीर नेत्या- अडवाणी

लोकसभेत भारत-अमेरीका अणुकरारावर चर्चा सुरु असताना अडवाणींनी हे उद्गार काढले. इंदिरा गांधी या खंबीर नेत्या होत्या. त्यांनी अमेरीकन आणि आंतरराष्ट्रीय दबावापुदे मान झुकवली नाही. त्यामुळेच राजकिय विरोधक असलो तरी त्यांचे कौतुक करण्यात मला काहिच गैर वाटत नाही.

अडवाणी पुढे म्हणाले की, इंदिरा गांधींनी पंतप्रधान या नात्याने देशाच्या संरक्षणाला नेहमीच प्राधान्य दीले म्हणूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय दबावापुढे न झुकता पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली. विद्यमान पंतप्रधानांनी कोणताही दबाव न घेता देशहिताचा निर्णय घ्यावा.

Tuesday, 8 April 2008

कणकवलीत कॉंग्रेस विजयी

बहुचर्चित कणकवली नगरपंचायतीचे निकाल आज जाहिर झाले. कॉंग्रेसने सर्वाधिक १० जागा जिंकत राष्ट्रवादीचा पराभव केला. शिवसेनेचा मोठा पराभव झाला. महसूलमंत्री नारायण राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मी आज दुपारी कणकवलीत गेलो होतो. कणकवलीला छावणीचे स्वरुप आले होते. दुकाने बंद होती. कडक उन्हाळ्यात कडक पोलीस बंदोबस्त अनुभवायला मिळाला.

पक्षीय बलाबल
कॉंग्रेस - १०
राष्ट्रवादी - ६
अपक्ष- १

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters