Sunday, 19 October 2008
Monday, 13 October 2008
चंद्रमुखी....रजनी....लकालकालकालका....


Sunday, 12 October 2008
पुन्हा एकदा
बरेच दिवस कामाच्या ताणामुळे काहीच लिहिले नाही. आज पुन्हा नव्याने सुरुवात करतोय. माझ्या अनुपस्थितही या ब्लॉगला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. गेले अनेक दिवस मी गायब झालो होतो. अधिव्याख्याता होण सोप नसत हे आता कळून चुकलय. मुलांना शिकवता शिकवता स्वतः शिकतोय. असो. सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरुन महाभारत सुरु झाले आहे. स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली तरी एखाद्या समुहाला स्वतःच्या विकासासाठी आरक्षणाची गरज भासते हे आपले दुर्दैवच आहे. काही जातींना आरक्षणाची खरीच गरज होती. पण ज्यांना गरज होती त्यांना त्याचा खरच फायदा झाला का? हा प्रश्न उरतोच.
लोकशाहीत सर्वांना विकासाची समान संधी मिळणे गरजेचं असतं. पण पन्नास वर्षांपुर्वी आपल्या देशाची सामाजिक परिस्थिती सर्वांना समान संधी देण्यास असमर्थ होती. त्यावेळी जातीनुसार आरक्षणाची गरज होती. पण आजच्या परिस्थितीत आर्थिक निकषावर आरक्षणाची गरज आहे. आरक्षण द्यायचेच असेल तर आर्थिकदृष्टया कमजोर घटकांना द्या. सर्वच जातीतील गरीबांना आरक्षण द्या. सर्वांना समान संधी मिळवून देणे आपल्याच हातात आहे. नवीन भिंती उभ्या करण्यापेक्षा आहेत त्या पाडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. गरीबांना आरक्षण द्याच पण सर्वच जातीतील गरीबांना द्या म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साधला जाईल.
Friday, 15 August 2008
Saturday, 12 July 2008
पदवीला प्रवेश घेताना....
विजयः- निकाल जाहीर झालेत अजूनही कुठे प्रवेश घ्यायचा हे नक्की नाही. तीन चार ठीकाणी अर्ज केलेत. बघूया काय होते ते?
अजयः- हो मी पण अर्ज केलेत. मला थोडे मार्क्स कमी आहेत. पण प्रयत्न चालू आहेत.
सध्या हे संवाद सर्रास ऎकायला मिळतील. काही मुले आणि पालक या प्रयत्नांना कंटाळतात. तर काही कमी मार्क्समुळे प्रवेशापासून वंचीत होतात. याच काळात पेपरमध्ये आकर्षक जाहिरातींचा सुकाळ असतो. अनेक कधीच नाव न ऐकलेल्या पदव्यांच्या जाहिराती वृत्तपत्रांत दररोज येत असतात. अनेकदा पालक या जाहिरातींनी भूलून जातात. नोकरीची पक्की हमी, अद्ययावत वर्ग, अनुभवी प्राध्यापक, अनेक विद्यार्थ्यांना फायदा ही ठरलेली वाक्ये असतात. अनेकदा पालक या जाहिरीतींमुळे फसतात. कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना तो अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे याची खात्री करुन घ्यावी. ज्या संस्थेत आपण प्रवेश घेणार असाल त्या संस्थेला विद्यापीठाची मान्यता आहे याची खात्री करुन घ्या. केवळ आकर्षक जाहिरातींना न भूलता त्या पदवीच्या उपयुक्ततेची योग्य चौकशी करा. स्वतः संस्था पाहून या आणि तज्ञ प्राध्यापकांचा जरुर सल्ला घ्या. जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या.