वाचनीय लेख
आज सर्फींग करता करता मला हा लेख सापडला. नंदकुमार सोमण यांनी हा लेख दै.पुढारीसाठी लिहीला आहे. लेखाचे नाव आहे .... तेथे कर माझे जुळती..
लेख वाचण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा
> http://pudhari.com/SindhuDurgStanikDetailNews.aspx?news_id=39274
जरुर वाचा.
Friday, 28 March 2008
Thursday, 27 March 2008
चांगली सुरुवात

आज दिवस अखेर भारताने एकही गडी न गमावता २१ षटकात ८२ धावा केल्या. द.आफ्रिकेच्या ५४० या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने आज चांगली धावगती राखली. विरेंद्र सेहवागने आज आपले या मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. दिवस अखेर तो ५२ धावांवर खेळत आहे. दुसऱ्या बाजूने जाफरने त्याला चांगली साथ दिली. त्याने २५ धावा फटकावल्या.
तत्पूर्वी द.आफ्रिकेने ५४० धावांचा डोंगर उभा केला. हरभजन सिंग ने ५ बळी मिळवले. भारतीय गोलंदाजानी ऑस्ट्रेलियात चांगली कामगीरी करुन देखील अशी खेळपट्टी का बनवली गेली हा प्रश्न मला पडलाय. खेळपट्टीमध्ये जानच दिसत नाही. गोलंदाजांना या खेळपट्टीचा कोणताच फायदा होत नाही आहे. आणखी एक पाटा खेळपट्टी.
उद्याचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरेल. आघाडीच्या फळीने दमदार सुरुवात द्यायला हवी. तरच आपण तग धरु शकू.
- वामन परुळेकर
Labels:
क्रिकेट
Wednesday, 26 March 2008
आत्महत्या चालूच
आत्महत्या चालूच
अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या जादुई बजेट नंतर देखील विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. बजेटनंतर तब्बल ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचली. एवढया मोठया प्रमाणावर आत्महत्या होताना सरकारने कोणते प्रयत्न केले याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहीजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून न पहाता माणुसकिच्या दृष्टीने पहायला हवे.
सर्व पक्षांनी एकत्र येवून काम करायला हवे. कार्यकर्त्यांची मोठी फौज मेळावे आणि आंदोलनात वापरण्यापेक्षा त्यांचा उपयोग शेतकऱ्यांच्या पुर्नवसनात व्हावा. परदेशात एका मृत्यूची देखील दखल घेतली जाते. येथे मात्र शेकडो मरुन देखिल आपले उपाय कमी पडतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय सरकारलाच आहे पण प्रश्न अजुनही गंभीर आहे. विदर्भातील आत्महत्या हा महाराष्ट्राला आणि पर्यायाने मराठी नगरीला लागलेला कलंक आहे.
गेल्या तीन दिवसात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारकडून मला अपेक्षा नाहीत. पण ईश्वराकडे एक प्रार्थना करु इच्छीतो.
"हे सर्व शक्तिमान ईश्वरा विदर्भातील शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीशी लढण्याचे धैर्य आणि सामर्थ्य दे."
- वामन परुळेकर
अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या जादुई बजेट नंतर देखील विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. बजेटनंतर तब्बल ६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचली. एवढया मोठया प्रमाणावर आत्महत्या होताना सरकारने कोणते प्रयत्न केले याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहीजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून न पहाता माणुसकिच्या दृष्टीने पहायला हवे.
सर्व पक्षांनी एकत्र येवून काम करायला हवे. कार्यकर्त्यांची मोठी फौज मेळावे आणि आंदोलनात वापरण्यापेक्षा त्यांचा उपयोग शेतकऱ्यांच्या पुर्नवसनात व्हावा. परदेशात एका मृत्यूची देखील दखल घेतली जाते. येथे मात्र शेकडो मरुन देखिल आपले उपाय कमी पडतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय सरकारलाच आहे पण प्रश्न अजुनही गंभीर आहे. विदर्भातील आत्महत्या हा महाराष्ट्राला आणि पर्यायाने मराठी नगरीला लागलेला कलंक आहे.
गेल्या तीन दिवसात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारकडून मला अपेक्षा नाहीत. पण ईश्वराकडे एक प्रार्थना करु इच्छीतो.
"हे सर्व शक्तिमान ईश्वरा विदर्भातील शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीशी लढण्याचे धैर्य आणि सामर्थ्य दे."
- वामन परुळेकर
Labels:
शेती
Tuesday, 25 March 2008
Subscribe to:
Posts (Atom)

