युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४
Friday, 11 June 2010
युनिअन कार्बाइड : भोपाळ १९८४
Labels:
माझा भारत,
युनिअन कार्बाइड,
राजकारण,
सुरक्षा
Thursday, 15 April 2010
द ग्रेट कर्नाटक
कर्नाटक म्हटल की उंच उंच तमिळ शैलीची मंदिरे, सुंदर आणि स्वच्छ बगिचे, मस्त काळेकुळकुळीत रस्ते आणि ब्रिटीशकालीन देखण्या इमारती डोळ्या समोर उभ्या राहतात. कर्नाटक विधानसभा आणि हायकोर्टची इमारत अप्रतिम आहे.
Thursday, 8 April 2010
लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर


लोकमान्य टिळकांच रत्नागिरीतील घर. "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हे विचार परखडपणे मांडणारे टिळक माझ्या डोळ्यासमोर उभे राहीले. भारतीय स्वातंत्र्यातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या घरी एक छोटे म्युझिअम आहे. त्यात त्यांनी वापरलेल्या वस्तु आणि तत्कालीन पत्रे संग्रहीत करण्यात आली आहेत. त्यांच्या घरानजिकच टिळक आळीतील ऐतिहासिक गणेश मंदिर आहे. जर मागे कॉंग्रेसचे पुरातन कार्यालय आहे. जिथे अनेक महान नेते वास्तव्य करुन गेले आहेत.
Labels:
कोकण,
माझा भारत,
राजकारण,
राष्ट्रवाद
Sunday, 7 March 2010
रांगोळी प्रदर्शन
रांगोळी प्रदर्शन
फिनोलेक्स इंजिनिरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी युटोपिया 2010 मध्ये रांगोळी प्रदर्शनात रेखाटलेल्या अप्रतिम रांगोळ्या. अनेक विद्यार्थ्यांनी या रांगोळी प्रदर्शनात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यातील काही निवडक रांगोळ्याची छायाचित्रे मी येथे पोस्ट करत आहे. इंजिनीअर असुनही या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण जपले आहेत त्याचे कौतुक वाटते. धन्यवाद.
Labels:
छायाचित्रे
Saturday, 28 November 2009
फयान नंतर
फयान नंतर
अजुनही अनेक मच्छिमार घरी परतलेले नाहीत. उदाहरणच द्यायचे तर दिनांक २८ नोव्हेंबर म्हणजे आजच्याच लोकमत मध्ये प्रकाशीत बातमीनुसार दापोली येथील शिरगावकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नही. केवळ मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मदत नाकारण्यात आली. शिरगावकर कुटुंबातील दोघे भाउ व एक भाचा बेपत्ता आहेत. या तिघांचेही निधन झाले असण्याची शक्यता आहे. त्यांचे मृतदेह शोधण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. यात शिरगावकर कुटुंबियांचा कोणताही दोष नाही परंतु तरीही ते केवळ सरकारी नियमांमुळे मदतीपासुन वंचित आहेत. अजुनही रत्नागिरी जिल्ह्यात ३० खलाशी बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत पोहचलेली नाही.
काही मच्छिमारांच्या जाळ्यांचे,बोटींचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. येथेही मोठा विनोद पहा, येथिल एका मच्छिमारी संस्थेला २५ नोव्हेंबर पर्यंत जाळी खरेदीच्या पावत्या सादर करा असे पत्र आले तेही २५ नोव्हेंबरलाच. एवढ्या कमी वेळात सर्व मच्छीमारांना ही बातमी मिळणे शक्य आहे का? मच्छिमारांनी जर पावत्या जपुन ठेवल्या नसतील तर त्यांना कधीच मदत मिळणार नाही का? आणि ज्यांच्या पावत्या आणि बोटींची कागदपत्रे वाहून गेलीत त्यांचे काय? ते मदतीस पात्र नाहीत का?? मच्छिमार बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचे आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
