Tuesday, 6 May 2008

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

एस्.टी.ला २३ कोटीचा नफा.

आपल्या एस्.टी.ला २३ कोटीचा नफा झाला आहे. एशियातील सर्वात मोठया परीवहन महामंडळासाठी ही खुशखबरच आहे. एस्.टी च्या ताफ्यात १६२०० बसेस आहेत. ही प्रगती अशीच राहीली तर पुढील वर्षी एस्.टी. १५० कोटीचा नफा कमावेल. चला महाराष्ट्रासाठी ही एक जमेची बाजू आहे.

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचे अभिनंदन

माझे ब्लॉगर मित्र आणि दै. गोमन्तकचे उपसंपादक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला अकोला येथील "अंकुर साहित्य संघा'तर्फे देण्यात येणारा 2007 चा "कवी बी पुरस्कार' (महाराष्ट्र वगळून) जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे मराठी समुदायतर्फे अभिनंदन.

संघातर्फे 10 व 11 मे रोजी चाळीसगाव येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्री. क्षीरसागर यांचा या आधी "गर्भावल्या संध्याकाळी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झालेला असून महाराष्ट्रातील विविध साहित्यविषयक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक संघटनेचा वेणेगुरकर स्मृती पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाला आहे. तसेच संवाद नाशिक व गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे कविता व कथालेखनाची पारितोषिके व मराठी विज्ञान परिषदेचा विज्ञानरंजन कथेचे पारितोषिक मिळाले आहे. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी कार्यकारिणी सदस्य, ताळगाव मराठी संस्कार केंद्राचे उपाध्यक्ष, कविकुल साहित्य मंचचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन उद्यापासून

दक्षिण कोकणचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवलीच्या प्रसिध्द वेतोबाचा १२ वा वर्धापन दिन ७ ते ९ मे या कालावधीत साजरा होणार आहे.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे -


मे

संध्याकाळी ७ ते १० - सौ.निलाक्षी पेंढारकर,सुरेश बापट,चंद्रकांत कोळी यांचा नाटयरजनी कार्यक्रम

रात्री ११ - नाइक-मोचेमाडकर कंपनीचा दशावतारी नाटयप्रयोग




मे

संध्याकाळी ७ ते ९ - स्वरांगण

रात्री ९.३० - "सोहं" प्रतिष्ठाण मुंबई यांचा सुधिर फडके यांच्या गीतांची मैफील



मे

दुपारी १ ते ४ - महाप्रसाद

रात्री ९ ते १० - देवाची पालखी

रात्री ११ वाजता - मुंबई मराठी साहित्य संघ यांचे अशोक परांजपे लिखित "संत गोरा कुंभार नाटक"

Monday, 5 May 2008

इस्राइल - वय वर्षे ६०

इस्राइल - वय वर्षे ६०



येत्या १४ मेला इस्राइल राष्ट्र ६० वर्षांचे होणार आहे. १४ मे १९४८ ला इस्राइलने स्वतःला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषीत केले होते. तेव्हापासून हा देश सतत युध्दात गुंतलेला आहे. गेली साठ वर्षे इस्राइलमध्ये अशांतता आणि हिंसा नांदते आहे. घरच्या स्वकिय शत्रुबरोबरच परकिय शत्रुंचा सामना इस्त्राइलला करावा लागतो. आपले जीवन सुरक्षित नसल्याचे अनेक इस्त्राइली नागरीकांना वाटते. गेली साठ वर्षे वापरलेल्या लष्करी ताकदीचा पॅलेस्टाइनचा प्रश्न सोडवण्यात फारसा उपयोग झाला नाही.

अशा या अशांत इस्त्राइलला शांतता लाभो आणि इस्त्राइली आणि पॅलेस्टीअन लोकांचे जीवन सुखी होवो हीच प्रार्थना करुया.

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

सध्याच्या जगात सर्वात मोठे प्रदूषण कोणते? माझ्या मते विचारांचे आणि आचारांचे प्रदूषण हे सध्याच्या जगातील सर्वात मोठे प्रदूषण आहे. जिकडे पहाल तिकडे हे प्रदूषण आहे. विचार एक आणि आचार वेगळाच. दिखावू विचार काय कामाचे? आपले नेते पहा ना फार मोठी मोठी आश्वासने देतात. पाळतात किती? पुरोगाम्यांची तीच परीस्थिती. महापुरुषांच्या विचारांची होळी करण्याचा विडाच काहीजणांनी उचलला आहे.महापुरुषांचे भिंतीवर लावलेले फोटो हे दिखाव्यासाठीच असतात. जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना भाषणे द्यायची आणि मग सगळे विसरुन जायचे.

आपण जे बोलतो ते प्रत्यक्षात किती आणतो? भ्रष्टाचारावर दररोज टीका होते, सर्वचजण टीका करतात, पण भ्रष्टाचार कमी होत नाही। मी स्वतः जातियतेवर नेहमी कठोर टीका करतो पण मी स्वतः मागे हटलो नाही। लाख विरोध असतानाही मी आंतरजातिय विवाह केला आहे. माझ्या मते जोपर्यंत आपण स्वतः पुढे येउन स्वतःचे विचार आचारात रुपांतरीत करत नाहीत तोपर्यंत जग बदलण्याचे स्वप्न बघण्यात अर्थ नाही. महापुरुषांचे विचार जर आपल्या बुध्दीला पटत असतील तर ते जरुर आचरणात आणावे. केवळ बोलुन काहीच फायदा नाही.

बाबा आमटे,मदर तेरेसा,महर्षी कर्वे,गाडगेबाबा यासारखे अनेक आदर्श आपल्याकडे आहेत ज्यांनी नेहमी आपले विचार सत्यात उतरवले. "अलसस्य कुतो विद्या?" तर मग चला चांगल्या विचारांचा संकल्प करा आणि हे विचार आचरणात आणा.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters