Friday, 21 March 2008

होळी

सर्वांना होळीच्या शुभेच्छा.


विजयदुर्ग सफर



मुंबईहून अंदाजे ४३० कि.मी. दूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग वसला आहे.आम्हाला मालवणहून येथे पोहचण्यास एक तास पंचेचाळीस मिनीटे लागली. १७ एकर परीसर विजयदुर्गने व्यापला आहे. या किल्ल्याची भिंत समुद्रापासून ३६ मी. उंच आहे. विजयदुर्गच्या पूर्ण बांधकामात जांभ्या दगडाचा वापर केला आहे.

इतिहास

विजयदुर्गची बांधणी शिलाहार राजा भोज याने केली. १२०८ च्या दरम्यान या किल्ल्याची बांधणी झाली असावी. त्यानंतर इ.स. १४३१ पर्यंत विजयदुर्ग, यादव राजे आणि विजयनगरच्या ताब्यात राहीला. इ.स. १४३१ मध्ये हा किल्ला बहमनी साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर १६५३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे या शूर मराठी सरदाराने विजयदुर्गला पहिले नाविक तळ उभारले.



किल्ल्या वरील प्रेक्षणिय स्थळे

>महादरवाजा
>तोफखाना
>दारुभंडार
>भुयारी मार्ग
>सदाशिव बुरुज
>खलबतखाना
>अश्वशाळा
>सदर
>गोविंद बुरुज
>चोरदरवाजा


- वामन परुळेकर

Thursday, 20 March 2008

दिल्ली लुटली

दिल्लीचा पाडाव
१७३९ साली आजच्याच दिवशी नादिरशहाने दिल्ली वर कब्जा केला आणि दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटली आणि इराणला पाठविली. मोठया स्वरुपात भरुन येणारी वित्तहानी झाली. हे मयुरासन सतराव्या शतकात मुघल बादशाह शाहजहान साठी तयार करण्यात आले होते. हे रत्नजडीत मयुरासन दिवान--आम मध्ये ठेवण्यात आले होते. या मयुरासनाची तत्कालिन किंमत करोड ते १० करोडच्या दरम्यान होती. दिल्लीचा पाडाव झाल्यानंतर नादिरशह मे १७३९ला परत निघाला. फेब्रुवारी १७३९ ते मे १७३९ दरम्यान तो भारतात होता.

मयुरासन

नादिरशहा हा इराणी साम्राज्याचा पाया होता. काही इतिहासकार त्याची तुलना नेपोलिअनशी करत असत. त्याने बलाढय साम्राज्य उभे केले होते. १७३८ च्या अखेरपर्यंत हे साम्राज्य कंदहार पर्यंत पसरले होते. नादिरशाहचा डोळा मुघल हिंदुस्थानवर होता. काबूल,गजनी करत नादिरची विशाल सेना लाहोरला पोचली. हिच योग्य वेळ आहे हे नादिरने ओळखले होते. मराठा साम्राज्याने मुघल साम्राज्याला खिळखिळे केले होते. अशा स्थितीत मुघलांचा पाडाव शक्य होता. फेब्रुवारी १७३९ ला कर्नाल मध्ये मुघलांचा पाडाव झाला. मोहम्मद शाहला अटक झाली. नादिरच्या सेनेने दिल्लीत प्रवेश केला. मुघल बादशाह अटकेत गेल्याची बातमी वाऱ्यासारखी देशात पसरली. बदला म्हणुन काही भारतीय राजांनी पर्शियन सेनेवर हल्लाबोल केला. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. नादिरला हे कळले, तेव्हा त्याने आपल्य सेनेला बदला घ्यायचा हूकुम दिला. २२ मार्च १७३९ तो काळा दिवस दिल्लीत बदल्यापोटी एका दिवशी २०००० ते ३०००० लोकांची हत्त्या झाली. मुघल बादशहा मोहम्मद शहा ने नादिरची माफी मागितली. नादिरने सैन्याला थांबण्याचे आदेश दिले.

बदल्यात बादशहाने शाही खजान्याच्या चाव्या नादिरकडे सुपूर्द केल्या. नादिरने मयुरासन,कोहीनूर,दर्यानूर,असंख्य रत्ने लुटली. मे १७३९ ला नादिर इराणकडे निघाला तेव्हा त्याच्या बरोबर हजारो हत्ती,घोडे आणि उंट होते. लुटीचा माल एवढा होता की इराण मध्ये तीन वर्षे सर्व कर माफ होते.





संदर्भ
-
द ज्वेल्स ऑफ इराण -- http://www.geocities.com/Pentagon/Base/1406/jewel/imperialjewels.html

नादिर साम्राज्य -
http://www.angelfire.com/empire/imperialiran/golestan.html

Wednesday, 19 March 2008

फुलपाकळी छान किती दिसते......

फुलपाकळी छान किती दिसते......


सीतारा

(परवाच आमच्या देशमुख सरांनी आम्हाला एका बंगाली चित्रपटाची कथा सांगितली. कथेचा लेखक कोण ते माहिती नाही पण लेखक नक्कीच महान असेल. सरांनी सांगितलेली ती कथा मी माझ्या शब्दात येथे लिहीत आहे. सरांनी आम्हाला कथा इंग्रजीतून ऐकवली. त्याचा मराठी अनुवाद मी करत आहे. )

तर या बंगाली चित्रपटाचा नायक एक टांगेवाला असतो. त्याचे नाव अब्दुल्ला असते. हा अब्दुल्ला म्हणजे अगदीच एकटा माणूस. नेहमीच एकांतात राहणारा. फारसा कोणाशी संबंध नाही. आपले काम आणि आपण हाच त्याचा नित्यक्रम असतो. अब्दुल्ला अगदी प्रामाणिक मनुष्य असतो.

तर या अब्दुल्लाचे लग्न ठरते. मुलगी एका खेडेगावातली असते. अब्दुल्ला कडून फार कमी माणसे लग्नास येतात.
अब्दुल्ला फुलांनी सजवलेल्या खुर्चीवर बसलेला असतो,तेवढयात एक छोटी मुलगी अब्दुल्ला जवळ येते.

"तो आप ही है, जो मेरी बहेन को मुझसे दुर ले जाने आये है। "
"हा बेटा. मै तुम्हारे बहेन से शादी करने आया हूँ "
एवढे ऐकून ती मुलगी पळून जाते.

ती छोटी मुलगी म्हणजे सीतारा. तिचा आपल्या बहिणीवर फार जीव असतो. ती आपल्या बहिणीशिवाय रहायला तयार नसते. विदाइच्या वेळी सीतारा रडून रडून बेजार होते. तिची ती स्थिती बघून अब्दुल्ला आपल्या बीबीला म्हणतो,
"उसे भी अपने साथ ले लो, वो तुम्हारे बिना नही जी सकेगी| "

अशा तऱ्हेने अब्दुल्लाच्या घरी आता दोन माणस रहायला आली. सीतारा पाचवीत शिकायची. रोज शाळेत जायची. अब्दुल्ला बरोबर तिचे आता फारच चांगले जमायचे. अब्दुल्ला तिला शाळेत सोडायचा. घरी आल्यावर तोच तिचा अभ्यास घ्यायचा. सीताराही अब्दुल्लाला शाळेतल्या, मैत्रिणींच्या गोष्टी सांगायची. सीतारा आता अब्दुल्लाच्या घरी फार रमली होती.

अब्दुल्ला रोज रविवारी सीताराला बाहेर फिरायला न्यायचा. भेळपुरी,आईसक्रिम,फुगे घेउन द्यायचा.
एका रविवारी अब्दुल्ला आणि सीतारा बाहेर फिरायला गेले होते. अब्दुल्ला टांगा चालवत होता. एवढयात ट्राफीकमुळे एका दुकानासमोर टांगा थांबला. त्या दुकानात एक सुंदर निळा फ्रॉक टांगलेला होता. सीताराला तो फार आवडला.
"चाचा वो फ्रॉक मुझे चाहिये"
अब्दुल्लाने दुकानाकडे पाहिले आणि लगेच तो म्हणाला
"सीतारा वो बंदर तो देख कितना उछल रहा है। चल उसे देखते है।"

सीतारा हिरमुसली. संध्याकाळी अब्दुल्लाने सीताराला घरी सोडले आणि तो पुन्हा बाहेर पडला. तो तडक त्या दुकानात गेला आणि दुकानदाराला फ्रॉकची किंमत विचारली.
"300 रुपये साहेब"
अब्दुल्ला खिन्न चेहऱ्याने बाहेर आला. एवढे पैसे कुठून आणणार हाच प्रश्न त्याला सतावत होता. आपल्या एका आठवडयाची कमाई पण एवढी होत नाही हे त्याच्या लक्षात आले. पण त्याच वेळी अब्दुल्लाने एक निश्चय केला. आता तो दुपारची चहा आणि वीडी टाळू लागला. जास्तीत जास्त काम करु लागला.

एका दुपारी तो घरी आला. तेव्हा त्याला कळले की, बायकोच्या घरुन तार आली आहे. वडील आजारी आहेत आणि त्या दोघींना जावे लागणार आहे. सीतारा रडू लागली पण त्यांचा नाईलाज होता. अब्दुल्ला त्यांना रेल्वेत बसवून आला. त्याच्या डोळ्यासमोर सीताराचा रडका आणि बावलेला चेहरा येत होता.

सकाळ उजाडली. अब्दुल्ला घाईघाईने कामावर गेला. आता जास्त कमवायचे. रात्री घरी कोणी वाट पहाणारे नाही, तेव्हा जास्त कष्ट करायचे त्याने मनोमनी ठरवले. त्याला तो फ्रॉक घ्यायचा होता आणि सीताराच्या चेहऱ्यावरचे हास्य पहायचे होते.

त्याच दिवशी दुपारी अब्दुल्लाला एक तार मिळाली. त्यात लिहीले होते की, "सीतारा आजारी आहे. आपण ताबडतोब यावे." अब्दुल्लाने विचार केला, आपण स्वतः गेलो तर खर्च जास्त होईल. त्याऐवजी पैसे पाठवले तर उपचार तरी होतील. त्याने 100 रु. मनीऑर्डर केली.

आता अब्दुल्ला जास्त कष्ट करत होता कारण हातातले पैसे तर संपले होते.
दुसऱ्या दिवशी दुपारी अब्दुल्ला घरी परतला तर त्याला दरवाजा उघडा दिसला. अब्दुल्ला आनंदला. सीतारा आली असेल. तो खुशीत होता.

तो घरात आला. सगळीकडे अंधार होता. त्याने बायकोला हाक दिली. आतल्या खोलीत बायको बसली होती.
"अरे तुम अकेली ही आयी हो। सीतारा कहा है?"

त्याचे वाक्य संपताच बायकोने हंबरडा फोडला. अब्दुल्ला स्तब्ध उभा होता. त्याला काहीच कळत नव्हते.
"क्या हुआ उसे? बताती क्यो नही?"

"क्या हुआ? अब पुछ रहे हो? बच्ची चाचा चाचा करते मर गयी। लेकीन तुम उसे देखने भी नही आये। शैतान हो तुम "

अब्दुल्लावर डोंगरच कोसळला. त्याला काहीच सुचेना. तो बाहेर गेला. पण तो पुर्ण स्तब्ध होता. बाहेर जोराचा पाउस पडत होता. विजा कडाडत होत्या. अब्दुल्ला तसाच भिजत उभा होता.

काही दिवसानंतर अब्दुल्ला पुन्हा कामावर जाउ लागला पण घरी बसाव लागत म्हणून. त्याला आता कष्ट करण्याची अजिबात ईच्छा नव्हती. तो वीडी पण ओढू लागला. आता गिऱ्हाईक मिळवायची त्याला अजिबात घाई नसायची. कोण आलेच तर त्याला सोडायचे. घरी जेवण पण मिळत नसे. तो स्वतः काहीतरी खाउन पोट भरायचा.

एके दिवशी एक वृध्द महिला त्याच्या टांग्यात बसायला आली. तीने त्याला बाजारात न्यायला सांगितले. फिरुन फिरुन एका दुकानासमोर तिने टांगा थांबवला. ते दुकान म्हणजे तेच, ज्या दुकानातील फ्रॉक त्याला सीतारासाठी घ्यायचा होता. ती बाई खरेदी करुन पुन्हा टांग्यात बसली. तीला अब्दुल्लाने ईच्छीत स्थळी सोडले. तीने अब्दुल्लाला जबरदस्तीने ५० रुपये दिले.

अब्दुल्ला घरी परतला. त्याने ते ५० रुपये आपल्या बीबीकडे दिले. स्वयंपाकघरामध्ये जाउन स्वतः जेवण घेतले. इकडे अब्दुल्लाची पत्नी बाहेर आली. तीला टांग्यात एक पार्सल दिसले. अब्दुल्लाच्या टांग्यात पार्सल? कुतूहलाने तिने ते पार्सल खोलले. त्यात निळा फ्रॉक गुंडाळला होता. ती तडक आत आली.

"ये क्या है? मेरे जखमोपर नमक डालने ये लाया है? जब बच्ची फ्रॉक मांग रही थी,तब आपने नही दिया। बच्ची आपका नाम लेते लेते मर गयी, लेकिन आप नही आये। आपके पास ये पैसे भी थे। तुम्हारे जैसा जानवर मैने कभी नही देखा। तुम क्रुर शैतान हो। "

अब्दुल्ला उष्टया हातांनी उभा होता. त्याने ते ताट तसेच टाकले आणि बाहेर आला. टांग्यात बसला आणि ढसाढसा रडू लागला. आज अब्दुल्लाचे अश्रू थांबत नव्हते. तो वेडयासारखा रडत होता. अब्दुल्ला तेथेच बसला. एवढया दिवसांचे दुःख आज त्याच्या डोळ्यात उतरले होते.

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters