Tuesday 19 February 2008

अखेर भारत विजयी


धोनी आणि युवराजच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने शेवटच्या षटकात विजयश्री खेचून आणली. एक वेळ भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता पण महेंद्रच्या संयमी खेळीमुळे आपण विजयी झालो. अखेर भारतीय संघाने पराभवाची साखळी तोडली. पहिल्या सत्रात काही वेळ भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व होते. नंतर मात्र संघकारा आणि महेला जयवर्धनेने चांगली भागीदारी निभावली. शेवटच्या षटकांमध्ये चांगली फटकेवाजी झाली.

भारताची सुरुवात खराब झाली सचिन शुन्यावर बाद झाला. संघाची पडझड धोनी आणि युवराजने रोखली. धोनीने एक बाजू लावून धरली आणि शेवटी त्यानेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिला.

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters