बायचुंग भुतियाची भुमिका योग्यच
भारतीय फुटबॉल संघाचा कप्तान बायचुंग भुतियाने ऑलिम्पिक दौडीत भाग न

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, राजकारण आणि खेळ यांना एकत्र आणू नये. मला हे योग्य वाटत नाही. राजकारण हा आपल्या जिवनाचा भाग आहे. जर राजकारणी काही चुकीचे निर्णय घेत असतील तर लोकशाहीत सर्वसामान्य नागरीकच त्यांना विरोध करतात. उदा. टॅक्सीचालक सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात टॅक्सी बंद ठेवतात,बॅंकवाले बॅंक बंद ठेवतात. गांधीजींनीच आपल्याला सविनय कायदेभंगाचा मार्ग दाखवला होता. तर मग आता सांगा , चीनच्या अन्यायी धोरणाचा निषेध करण्यासाठी बायचुंगने घेतलेला निर्णय अयोग्य कसा?
गेली कित्येक वर्षे तिबेटी बौध्द जनतेवर चीनी राज्यकर्ते राज्य करत आहेत. तिबेटी

तर हिंसा करुन ऑलिम्पिक ज्योत तिबेटमध्ये नेण्याचे प्रयत्न का चालू आहेत? बायचुंगला विरोध करणाऱ्यांनी याचा जरुर विचार करावा.
- वा.रा.परुळेकर
3 comments:
आपले परिक्शन आणि निरिक्शन दोन्ही फ़ार छान आहे.
Agreed!!
धन्यवाद मित्रांनो
Post a Comment