Sunday 13 April 2008

जीवाची बाजी

शुक्रवारी दोघा जोडप्यांना वाचविताना स्वतःचे प्राण देणारा मोहन रेडकर खऱ्या अर्थाने साहसी वीर ठरला. शुक्रवारी मुंबई येथील बॅंडस्टॅंड येथे खडकावर बसलेल्या दोघा जोडप्यांना भरतीच्या पाण्याचा अंदाज आला नाही. एका खडकावरुन दुसऱ्या खडकावर असे करत ही जोडपी बरीच पुढे गेली. मात्र थोडया वेळाने भरतीच्या पाण्याने त्यांना वेढले. ही जोडपी मदतीसाठी आक्रोश करु लागली. त्यांचा आक्रोश पाहून त्या मार्गाने जाणारा मोहन जीवाची बाजी लावून पाण्यात गेला. त्याने शर्थीचे प्रयत्न करुन त्या जोडप्यांना वाचविले. पण या प्रयत्नात मोहनने स्वतःचे प्राण गमावले. दुसऱ्याचे प्राण वाचवाणारा मोहन आज आपल्यात नाही. आपल्या आईच्या कानाचे यंत्र आणण्यासाठी मोहन तेथे गेला होता.

मोहनवर त्याच्या गावी मालवणात आज अंत्यसंस्कार होतील. मोहनसारखे शूरवीर फार कमी आहेत. आजकाल दुसऱ्यांचे प्राण घेणारे स्वतःला शूर,धाडसी मानतात. अशा कलीयुगात दुसऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः प्राण देणारे फार कमी. मोहनच्या परीवाराला आधार देण्याचे काम सरकारने आणि समाजाने करावे.

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters