Monday 14 April 2008

पुरोगामी महाराष्ट्र

आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. तीन दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले जयंती होती. महाराष्ट्राच्या समाजसुधारणा चळवळीचे दोन महान नेते. आपण दरवर्षी नित्यनेमाने या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, मिरवणुका काढतो आणि बरेच काही.

पण आज महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीची स्थिती काय आहे? आज आपला समाज भविष्य, अंधश्रध्दा, बुवाबाजीत फसत चालला आहे. या समाजाला दिशा दाखवणारे प्रभावी समाजसुधारक, पुरोगामी नेतेच नाहीत. जे स्वतःला पुरोगामी समजतात त्यांना पुरोगामी शब्दाचा अर्थच माहिती नसेल.

आपले पुरोगामी राजकारणी त्यांच्याबद्दल काय बोलणार?(जुन्या राजकारण्यांचे अपवाद वगळता) ज्या पुण्यात पुरोगाम्यांचे राज्य आहे त्या पुण्यात कोणाकोणाचे सत्कार झाले (सर्वसामान्य जनतेच्या पैशात ) ते आपणा सर्वांस ज्ञात आहे. अर्थात नेत्यांना तरी किती दोष देणार त्यांना निवडून देणार आपणच. जेव्हा आपल्यासारखे बुध्दीवादीच आपली बुध्दी गहाण ठेवतात तेव्हा इतरांना दोष देण्यात अर्थ नाही.

गरज आहे ती या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना त्यांचे विचार ग्रहण करण्याची. काही लोकांना समाज सुधारलेला अजिबात आवडणार नाही कारण त्यांचा हेतू समाजाला आपल्या गुलामीत ठेवण्याचा असतो. माणुसकी हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे हे विसरुन चालणार नाही. बाहेर जायची गरजच नाही महाराष्ट्रातील संतानी आपल्याला समाज सुधारणेचा,स्वच्छतेचा आणि वैश्विकतेचा उपदेश दिला आहे. तो आपण पाळला तरी पुरेसे आहे.

- वामन परुळेकर



No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters