कोकणात आता आंब्याचा मोसम सुरु झाला आहे. आंबा,काजू,फणस,जांभुळ ही फळे मिळण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या दरम्यान आंब्यांच्या बागेमध्ये कडेकोट सुरक्षा असते. आंब्यांची चोरी होण्याचे प्रकार रोखण्यासाठी मालक डोळ्यात तेल घालून पहारा देतात. रात्रीच्या वेळी पहाऱ्याची खरी गरज असते. या पहाऱ्यासाठी अजूनही काही ठिकाणी कंदील वापरले जातात. आज मी रत्नागिरी येथील एका स्थानिक बागेस भेट दिली, त्यावेळी हा कंदिल मला तेथे दिसला. तेथे टिपलेले हे क्षण मी येथे पाठवत आहे.....



- वामन परुळेकर
2 comments:
आंबे घेवुनच या आता परततांना
हो हो जरुर
Post a Comment