Friday 21 March 2008

विजयदुर्ग सफर



मुंबईहून अंदाजे ४३० कि.मी. दूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग वसला आहे.आम्हाला मालवणहून येथे पोहचण्यास एक तास पंचेचाळीस मिनीटे लागली. १७ एकर परीसर विजयदुर्गने व्यापला आहे. या किल्ल्याची भिंत समुद्रापासून ३६ मी. उंच आहे. विजयदुर्गच्या पूर्ण बांधकामात जांभ्या दगडाचा वापर केला आहे.

इतिहास

विजयदुर्गची बांधणी शिलाहार राजा भोज याने केली. १२०८ च्या दरम्यान या किल्ल्याची बांधणी झाली असावी. त्यानंतर इ.स. १४३१ पर्यंत विजयदुर्ग, यादव राजे आणि विजयनगरच्या ताब्यात राहीला. इ.स. १४३१ मध्ये हा किल्ला बहमनी साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर १६५३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहा कडून जिंकून घेतला. १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे या शूर मराठी सरदाराने विजयदुर्गला पहिले नाविक तळ उभारले.



किल्ल्या वरील प्रेक्षणिय स्थळे

>महादरवाजा
>तोफखाना
>दारुभंडार
>भुयारी मार्ग
>सदाशिव बुरुज
>खलबतखाना
>अश्वशाळा
>सदर
>गोविंद बुरुज
>चोरदरवाजा


- वामन परुळेकर

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters