Thursday 27 March 2008

चांगली सुरुवात



आज दिवस अखेर भारताने एकही गडी न गमावता २१ षटकात ८२ धावा केल्या. द.आफ्रिकेच्या ५४० या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने आज चांगली धावगती राखली. विरेंद्र सेहवागने आज आपले या मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. दिवस अखेर तो ५२ धावांवर खेळत आहे. दुसऱ्या बाजूने जाफरने त्याला चांगली साथ दिली. त्याने २५ धावा फटकावल्या.

तत्पूर्वी द.आफ्रिकेने ५४० धावांचा डोंगर उभा केला. हरभजन सिंग ने ५ बळी मिळवले. भारतीय गोलंदाजानी ऑस्ट्रेलियात चांगली कामगीरी करुन देखील अशी खेळपट्टी का बनवली गेली हा प्रश्न मला पडलाय. खेळपट्टीमध्ये जानच दिसत नाही. गोलंदाजांना या खेळपट्टीचा कोणताच फायदा होत नाही आहे. आणखी एक पाटा खेळपट्टी.

उद्याचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरेल. आघाडीच्या फळीने दमदार सुरुवात द्यायला हवी. तरच आपण तग धरु शकू.

- वामन परुळेकर

No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters