Sunday 15 January 2012

पानिपत - एक शौर्यगाथा


पानिपतची लढाई ही एक शौर्यगाथाच आहे. मराठे हरले पण शत्रूच्या मनात दहशत बसवून हरले.  दत्ताजी शिंदेंचा  "बचेंगे तो और भी लढेंगे" हा आशावाद आणि निडर शौर्यगाथा म्हणजे पानिपत. महाराष्ट्रात मकर संक्रात साजरी होत असताना तिथे पानिपतात लाखो मराठे धारातीर्थी पडले. हजारो मराठी कुटुंब उध्वस्त झाली. या युद्धाचा मराठी मनावर गंभीर आघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणारा प्रचंड प्रतिकार करणारा मराठ्यांचा प्रमुख सरदार इब्राहिम खान गारदी पकडला गेला. त्याचे हाल हाल करून त्याला ठार मारण्यात आले. मराठी साम्राज्याची रक्षा करता करता बलिदान दिलेल्या त्या लाखो ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन.. या स्मृती दिनाच्या निमित्याने स्टार माझाने खास कार्यक्रम प्रक्षेपित केला होता त्याचे युट्यूबवरील व्हिडिओ लिंक मी येथे देत आहे. जरूर पहा.        




No comments:

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters