पदवीला प्रवेश घेताना....
विजयः- निकाल जाहीर झालेत अजूनही कुठे प्रवेश घ्यायचा हे नक्की नाही. तीन चार ठीकाणी अर्ज केलेत. बघूया काय होते ते?
अजयः- हो मी पण अर्ज केलेत. मला थोडे मार्क्स कमी आहेत. पण प्रयत्न चालू आहेत.
सध्या हे संवाद सर्रास ऎकायला मिळतील. काही मुले आणि पालक या प्रयत्नांना कंटाळतात. तर काही कमी मार्क्समुळे प्रवेशापासून वंचीत होतात. याच काळात पेपरमध्ये आकर्षक जाहिरातींचा सुकाळ असतो. अनेक कधीच नाव न ऐकलेल्या पदव्यांच्या जाहिराती वृत्तपत्रांत दररोज येत असतात. अनेकदा पालक या जाहिरातींनी भूलून जातात. नोकरीची पक्की हमी, अद्ययावत वर्ग, अनुभवी प्राध्यापक, अनेक विद्यार्थ्यांना फायदा ही ठरलेली वाक्ये असतात. अनेकदा पालक या जाहिरीतींमुळे फसतात. कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना तो अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे याची खात्री करुन घ्यावी. ज्या संस्थेत आपण प्रवेश घेणार असाल त्या संस्थेला विद्यापीठाची मान्यता आहे याची खात्री करुन घ्या. केवळ आकर्षक जाहिरातींना न भूलता त्या पदवीच्या उपयुक्ततेची योग्य चौकशी करा. स्वतः संस्था पाहून या आणि तज्ञ प्राध्यापकांचा जरुर सल्ला घ्या. जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या.
Saturday, 12 July 2008
Tuesday, 1 July 2008
म.टा.ने पुढे केला मदतीचा हात.
म.टा.ने पुढे केला मदतीचा हात
समाजात अशी अनेक मुले असतात ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या या मुलांसाठी म.टा.ने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांची यशोगाथा म.टा. प्रसिध्द करणार आहे. म.टा.ने हे अभिनंदनिय पाउल उचलले आहे. समाजसेवा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी आणि संस्थांनी याची दखल घ्यावी.
मटा हेल्पलाइन
समाजात अशी अनेक मुले असतात ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या या मुलांसाठी म.टा.ने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांची यशोगाथा म.टा. प्रसिध्द करणार आहे. म.टा.ने हे अभिनंदनिय पाउल उचलले आहे. समाजसेवा करणाऱ्या सर्व व्यक्तींनी आणि संस्थांनी याची दखल घ्यावी.
मटा हेल्पलाइन
Labels:
मराठी,
महाराष्ट्र,
मुंबई
Saturday, 28 June 2008
फील्ड मार्शल माणेकशॉ तुझे सलाम ....
७१च्या भारत-पाक युध्दात भारताचे नेतृत्त्व करणारे माजी लष्करप्रमुख फील्ड मार्शल माणेकशॉ यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली. १९४८च्या जम्मू-काश्मीर लष्करी कारवाईच्यावेळी त्यांनी भारताचे यशस्वी नेतृत्त्व केले होते. ७१च्या युध्दातील त्यांची कामगीरी विशेष गाजली. बांगलादेश हे राष्ट्र उदयास आले. त्यांच्यावर काही लोकांनी खोटे आरोप लावले पण ते निराशेतून केलेले आरोप होते. ते स्वतंत्र भारताचे पहिले फिल्ड मार्शल होते. १९७३मध्ये त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. हा पुरस्कार मिळालेला सेनापती कधीच निवृत्त होत नसतो. या सेनापतीच्या निधनाने केवळ भारतातच नव्हे तर बांग्लादेशातही दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
अशा या शूरवीर सेनापतीस भावपूर्ण श्रध्दांजली.
अशा या शूरवीर सेनापतीस भावपूर्ण श्रध्दांजली.
Labels:
श्रध्दांजली
Friday, 27 June 2008
आज म्या वळू पाहिला...
आज म्या वळू पाहिला...
बऱ्याच दिवसापासून वळू पाहण्याची ईच्छा होती ती आज पूर्ण झाली. वळू म्हणजे खराखुरा वळू नव्हे तर वळू मराठी चित्रपट. श्वासनंतर मराठी चित्रपटांनी कात टाकली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपट तयार झाले. खरेतर दर्जेदार आणि चित्रपटाला होणारी गर्दी याचा काही थेट संबंध नसतो. हे नाटकालाही लागू पडतं. दर्जेदार नाटकांकडे लोक पाठ फिरवतात आणि सुमार नाटकांना गर्दी होते. असो तर मुख्य विषय हा की मी आज वळू पाहिला. माझा या चित्रपटाविषयी पूर्वग्रह फारच चांगला झाला होता. माझ्या सर्व मित्रांना हा चित्रपट अतिशय आवडला होता. ब्लॉग्जदुनियेत या चित्रपटाविषयी फार चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे माझ्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या पण चित्रपट पाहिल्यावर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी तरी चित्रपट सुमार नाही. चित्रपट चांगला झालाय. अर्थात आवड-निवड प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाची मतेही वेगळी असू शकतात.
मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती. अभिनय सर्वांचा चांगला झाला आहे. अमृता सुभाष, ज्योती सुभाष, जिवन्याच्या भूमीकेतील कलाकार, निर्मिती सावंत यांच्या भुमिका छान झाल्यात. दिलीप प्रभावळकर यांना दिलेली भूमिका प्रभावी वाटली नाही.
काही लोकांनी या चित्रपटातील चांगल्या कपडयाबद्दल घेतलेला आक्षेप मला रुचला नाही. खरे तर आता गावातील लोक चित्रपटात दाखवलेल्या कपडयांपेक्षाही चांगले कपडे परीधान करतात. कपडयांच्याबाबतीत चित्रपटात काहीही चुकीचे वाटत नाही. चित्रपट मध्यांतरापर्यंत डॉक्युमेंट्रीमध्ये अडकल्यासारखा वाटला पण मध्यांतरानंतर चित्रपट वेगवान वाटला. शेवटच्या समारोपाच्या प्रसंगात अतुल कुलकर्णीला बांधलेला वेगवान फेटा मस्तच वाटला. या चित्रपटात ग्रामीण जीवनाचे चांगले चित्रीकरण केले आहे. ग्रामीण भाषा, पेहराव योग्य वाटले. अमृता सुभाषची प्रेमकहाणी आणि ज्योती सुभाषचा डुरक्यावरील जीव ह्या दोन्हींचे फार चांगले चित्रीकरण झाले आहे. अर्थात ही माझी वैयक्तीक मते आहेत. आपली मते वेगळी असू शकतात. वाचल्याबद्दल
मला तर चित्रपटातला वळू शेवटपर्यंत उपद्रवी वाटला नाही. वळू दिसायला धिप्पाड आणि गोंडस होता. मला तर त्याची दयाच येत होती. अभिनय सर्वांचा चांगला झाला आहे. अमृता सुभाष, ज्योती सुभाष, जिवन्याच्या भूमीकेतील कलाकार, निर्मिती सावंत यांच्या भुमिका छान झाल्यात. दिलीप प्रभावळकर यांना दिलेली भूमिका प्रभावी वाटली नाही.
काही लोकांनी या चित्रपटातील चांगल्या कपडयाबद्दल घेतलेला आक्षेप मला रुचला नाही. खरे तर आता गावातील लोक चित्रपटात दाखवलेल्या कपडयांपेक्षाही चांगले कपडे परीधान करतात. कपडयांच्याबाबतीत चित्रपटात काहीही चुकीचे वाटत नाही. चित्रपट मध्यांतरापर्यंत डॉक्युमेंट्रीमध्ये अडकल्यासारखा वाटला पण मध्यांतरानंतर चित्रपट वेगवान वाटला. शेवटच्या समारोपाच्या प्रसंगात अतुल कुलकर्णीला बांधलेला वेगवान फेटा मस्तच वाटला. या चित्रपटात ग्रामीण जीवनाचे चांगले चित्रीकरण केले आहे. ग्रामीण भाषा, पेहराव योग्य वाटले. अमृता सुभाषची प्रेमकहाणी आणि ज्योती सुभाषचा डुरक्यावरील जीव ह्या दोन्हींचे फार चांगले चित्रीकरण झाले आहे. अर्थात ही माझी वैयक्तीक मते आहेत. आपली मते वेगळी असू शकतात. वाचल्याबद्दल
धन्यवाद.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. राज्यात प्रथम आलेल्या साताऱ्याच्या गौरव कुलकर्णी (९७.८४%) याचेही हार्दिक अभिनंदन. असेच यशस्वी व्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करा.
खाली दिलेल्या सर्व पहिल्या क्रमांकाच्या मानकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
राज्यात प्रथम - गौरव कुलकर्णी (९७.८४%)
मुलींमध्ये पहिल्या - पूजा वानखेडे (यवतमाळ), सायली रूपसिंह सागर (उमरगा)- ९७.२३ %
रात्र शळेत पहिला - मेहदी गुलाम हुसेन महंमद (नागपूर) ८८.१५ %
अपंगांमध्ये पहिली - मनाली जाधव ९६.४६ %
मागासवर्गीयांत पहिली - सुरभी गणवीर (नागपूर) ९७.०७ %
दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. राज्यात प्रथम आलेल्या साताऱ्याच्या गौरव कुलकर्णी (९७.८४%) याचेही हार्दिक अभिनंदन. असेच यशस्वी व्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्वल करा.
खाली दिलेल्या सर्व पहिल्या क्रमांकाच्या मानकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
राज्यात प्रथम - गौरव कुलकर्णी (९७.८४%)
मुलींमध्ये पहिल्या - पूजा वानखेडे (यवतमाळ), सायली रूपसिंह सागर (उमरगा)- ९७.२३ %
रात्र शळेत पहिला - मेहदी गुलाम हुसेन महंमद (नागपूर) ८८.१५ %
अपंगांमध्ये पहिली - मनाली जाधव ९६.४६ %
मागासवर्गीयांत पहिली - सुरभी गणवीर (नागपूर) ९७.०७ %
Labels:
अभिनंदन,
मराठी,
महाराष्ट्र
Subscribe to:
Posts (Atom)












